शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पर्यटकांमुळे शेगावकरांना स्वाईन फ्लूचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 19:58 IST

शेगाव : पर्यटकांच्या पसंतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या शेगाव शहराला स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे.

फहीम देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : राज्यातील मोठ्या शहरांमध्ये स्वाईन फ्लूने कहर केलेला असून मोठ्या शहरातील हा आजार आता विदर्भात पोहचला आहे. पर्यटकांच्या पसंतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या शेगाव शहराला स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे.बुलडाणा जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा जोर वाढल्याने स्वाईनचा धोका कमी होईल, असे वाटत असतानाच आता पावसाळा सुरु झाल्याने वातावरणात कमालीचा गारठा पसरला. परिणामी स्वाईन फ्लूला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यात स्वाईन फ्लू आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक संशयित रुग्ण बरे झाले आहेत. दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यभर स्वाईनच्या संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. पावसामुळे हवेत वाढलेला गारठा स्वाईन फ्लूला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणार आहे. बदलेल्या वातारवणामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सर्दी-खोकला झालेल्या रूग्णांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. दुसरीकडे शेगाव येथे अध्यात्म आणि विज्ञानाच्या पायावर उभा असलेला आनंदसागर पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक शेगावात पोहचत आहेत. लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे मागील आठवड्यात शेगाव हाऊसफुल्ल झाले होते. अशा परिस्थितीत इतर शहरातून आलेल्या एखाद्या रुग्णामुळे स्वाईन फ्लू या भागात ही पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुलडाणा शहरातील एका खाजगी रुग्णालयात ताप व सर्दी झालेले काही रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे नमुने पुणे येथे तपासल्यानंतर पाच जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांपैकी मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील प्रदीप निनाजी नारखेडे यांचा मृत्यू झाला. तसेच बुलडाण्यातील केशवनगरातील ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच सविता संजय चोपडे, राहुल चव्हाण यासह बारा जणांना या भीषण आजाराची लागण झाली आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने कहर केला असून, दोघांचा मृत्यू, तर पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरजजिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, त्यांचे नमुनेच पाठविण्यात आले नसल्यामुळे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र हात झटकत असून, स्वाइन फ्लूचे रुग्णच नसल्याचा दावा करीत आहे.असे असले तरी जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका सर्वात जास्त शेगाव शहराला आहे. याठिकाणी पर्यटक आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता आरोग्य विभागाने वेळीच उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे.