शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराज बेपत्ता, चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 06:10 IST

खामगाव: येथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प. पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. नापासांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प. पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही ...

खामगाव: येथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प. पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. नापासांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प. पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही जणांकडून त्यांना हेतुपुरस्परपणे त्रास दिला जात होता, असा उल्लेख शंकर महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. आश्रमाशी संबंधित पाच जणांनी सत्कार्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळेच आपण खामगाव सोडत असल्याचेही महाराजांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.जागृतीमधील वाद विकापोला जात असल्याचे निदर्शनास येताच, शंकर महाराजांनी गेल्या वर्षभरापूर्वीच सजनपुरी परिसरात तपोवनाची निर्मिती केली होती. तेव्हापासूनच महाराज शेलोडी येथील आश्रमात जाण्याचे टाळत होते.  परंतु यावादावर तोडगा निघत नसल्याने व्यथित झालेल्या महाराजांनी रविवारी तपोवन सोडले. आपला शोध न घेण्याची विनंतीही महाराजांनी चिठ्ठीत केली असून गेल्याकाही दिवसांपासून जागृतीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जागृती आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून महाराज निघून गेल्याच्या वृत्ताला दुजारो देण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रारीसंदर्भात तपोवन येथे बैठक सुरू होती. यासंदर्भात सोशल मिडीयावर देखील पोस्ट व्हायरल झाली असून, अनुयांकडून महाराजांचा शोध घेण्यात येत आहे. काही भाविक रात्रीच तपोवन येथे दाखल झाले असून, महाराज सुखरूप परत यावेत, यासाठी तपोवनात  हनुमान चालीसा पठण आणि सामुहिक प्रार्थना केली जात आहे.सोमवारी चिठ्ठी वाचण्याचा दिला होता सल्ला!शंकर महाराज तपोवनातून निघून गेल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. महाराजांनी तपोवन सोडण्यापूर्वी विश्वासू सेवेक-यांकडे एक चिठ्ठी सोपविली होती. ही चिठ्ठी सोमवारी सकाळी १० वाजता वाचावी, अशी आज्ञा शंकर महाराजांनी केली होती. मात्र, धक्कादायक बाबीमुळे  या चिठ्ठीचे रात्री वाचन करण्यात आले. त्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.