शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराज बेपत्ता, चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 06:10 IST

खामगाव: येथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प. पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. नापासांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प. पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही ...

खामगाव: येथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प. पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. नापासांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प. पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही जणांकडून त्यांना हेतुपुरस्परपणे त्रास दिला जात होता, असा उल्लेख शंकर महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. आश्रमाशी संबंधित पाच जणांनी सत्कार्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळेच आपण खामगाव सोडत असल्याचेही महाराजांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.जागृतीमधील वाद विकापोला जात असल्याचे निदर्शनास येताच, शंकर महाराजांनी गेल्या वर्षभरापूर्वीच सजनपुरी परिसरात तपोवनाची निर्मिती केली होती. तेव्हापासूनच महाराज शेलोडी येथील आश्रमात जाण्याचे टाळत होते.  परंतु यावादावर तोडगा निघत नसल्याने व्यथित झालेल्या महाराजांनी रविवारी तपोवन सोडले. आपला शोध न घेण्याची विनंतीही महाराजांनी चिठ्ठीत केली असून गेल्याकाही दिवसांपासून जागृतीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जागृती आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून महाराज निघून गेल्याच्या वृत्ताला दुजारो देण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रारीसंदर्भात तपोवन येथे बैठक सुरू होती. यासंदर्भात सोशल मिडीयावर देखील पोस्ट व्हायरल झाली असून, अनुयांकडून महाराजांचा शोध घेण्यात येत आहे. काही भाविक रात्रीच तपोवन येथे दाखल झाले असून, महाराज सुखरूप परत यावेत, यासाठी तपोवनात  हनुमान चालीसा पठण आणि सामुहिक प्रार्थना केली जात आहे.सोमवारी चिठ्ठी वाचण्याचा दिला होता सल्ला!शंकर महाराज तपोवनातून निघून गेल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. महाराजांनी तपोवन सोडण्यापूर्वी विश्वासू सेवेक-यांकडे एक चिठ्ठी सोपविली होती. ही चिठ्ठी सोमवारी सकाळी १० वाजता वाचावी, अशी आज्ञा शंकर महाराजांनी केली होती. मात्र, धक्कादायक बाबीमुळे  या चिठ्ठीचे रात्री वाचन करण्यात आले. त्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.