शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

By विवेक चांदुरकर | Updated: May 13, 2024 17:38 IST

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

विवेक चांदूरकर, संग्रामपूर : एका बाजूला वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असतांना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत.

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी ग्राम वसाली येथे गेल्या काही दिवसांपासून कुपनलिकेतील मोटर पंपात बिघाड झाला. नादुरुस्त झालेल्या पंपांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नसल्याने येथे पाण्याची समस्या उद्भवली. परीणामी येथील आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी महिलांचे प्रचंड हाल होत असून येथील पाणी प्रश्न गंभीर होत आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत गांभिर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागत आहेत. अगोदरच उकाड्याने हैराण केले असून उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वर सरकत आहे. सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप होत असून ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दहा पैकी केवळ एकच हातपंप सूरू-

वसाली येथे १० हात पंप बसविण्यात आले आहेत. यापैकी ९ हातपंप बंद असून केवळ एकच हातपंप सूरू असल्याने येथील ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने एकच हातपंप सूरू असल्याची माहिती ग्रामसेवकाने दिली आहे.

कुपनलिकेतील नादुरुस्त मोटर पंप बाहेर काढून दुरूस्ती करण्यात आले. दुरुस्त पंपाला पुन्हा कुपनलिकेत सोडण्यात आले असून गावातील पाणी पुरवठा नेहमी प्रमाणे सुरळीत करण्यात आला आहे.- बी. पी. धोंडगे, ग्रामसेवक, वसाली ता. संग्रामपूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई