शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

By विवेक चांदुरकर | Updated: May 13, 2024 17:38 IST

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

विवेक चांदूरकर, संग्रामपूर : एका बाजूला वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असतांना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत.

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी ग्राम वसाली येथे गेल्या काही दिवसांपासून कुपनलिकेतील मोटर पंपात बिघाड झाला. नादुरुस्त झालेल्या पंपांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नसल्याने येथे पाण्याची समस्या उद्भवली. परीणामी येथील आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी महिलांचे प्रचंड हाल होत असून येथील पाणी प्रश्न गंभीर होत आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत गांभिर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागत आहेत. अगोदरच उकाड्याने हैराण केले असून उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वर सरकत आहे. सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप होत असून ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दहा पैकी केवळ एकच हातपंप सूरू-

वसाली येथे १० हात पंप बसविण्यात आले आहेत. यापैकी ९ हातपंप बंद असून केवळ एकच हातपंप सूरू असल्याने येथील ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने एकच हातपंप सूरू असल्याची माहिती ग्रामसेवकाने दिली आहे.

कुपनलिकेतील नादुरुस्त मोटर पंप बाहेर काढून दुरूस्ती करण्यात आले. दुरुस्त पंपाला पुन्हा कुपनलिकेत सोडण्यात आले असून गावातील पाणी पुरवठा नेहमी प्रमाणे सुरळीत करण्यात आला आहे.- बी. पी. धोंडगे, ग्रामसेवक, वसाली ता. संग्रामपूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई