शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील सात पूल धोकादायक

By admin | Updated: June 24, 2017 05:42 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : पावसाळय़ातील पुरादरम्यान उद्भवते बिकट स्थिती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बर्‍याच वेळा पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आला की, पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे नदी व मार्गावरील पुलनिर्मिती करताना गांभीर्याने पाहिले जाते; परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत ब्रिटिशकाळी २१ पूल असून, त्यापैकी सात पुलांची अवस्था धोकादायक आहे.गावाच्या विकासासाठी शासनाने ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली आहे. शिवाय बरेच पूल १९२६ ते १९३९ या ब्रिटिश काळात बांधण्यात आले आहे. या पुलांची मजबुती कायम ठेवण्यासाठी पुलांची उंची कमी ठेवण्यात आली आहे. नदी-नाल्यांवर निर्माण केलेले पूल मजबूत असणे आवश्यक आहे; मात्र बर्‍याच वेळा पावसात ग्रामीण भागात नदीला पूर आल्यामुळे पुलांच्या सुरक्षा कठड्याची पडझड होऊन नुकसान होते. काही वेळा यामुळे गावाचाही संपर्क तुटतो. बुलडाणा शहर ब्रिटिशकाळात ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत जागरूकता दाखवत ब्रिटिश अधिकार्‍यांनी येथील विविध नद्यांवर अनेक पुलांची निर्मिती केले. यापैकी सद्यस्थितीत सात पुलांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो; मात्र या पुलांची प्रशासनाकडे नियमित देखभाल होत नसल्यामुळे सर्वच पूल जर्जर झाले आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या पुलांवर प्रवास करावा लागतो.धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायकधाड: गत २0 ते २२ वर्षांंंपूर्वी बांधण्यात आलेल्या धाडनजीक बाणगंगा नदीवरील पुलामुळे रहदारी आणि नागरी वस्तीस धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या सुरक्षेबाबत चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कुठलीच उपाययोजना न केल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पाणी या पुलावरून वाहते. शिवाय परिसरातील कचरा पुलात अडकत असल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धाडनजीक धामणगाव धाड रोडवर बाणगंगा नदीवर करडी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या साडव्याचे पाणी ही गावलगत जुन्या फरशी परिसरात येऊन पोहचल्यामुळे त्यावेळी चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईत सिमेंटची पाइप टाकून बाणगंगा नदीवर २0 फूट रुंदीचा आणि साधारण २00 फुटांपेक्षा अधिक लांबीच्या पुलाचा पूल बांधला. पुलाची उंची कमी असल्यामुळे जास्त पाऊस झाला की या पुलापर्यंंंत धरणाचे पाणी येऊन साचले आणि नदीला पूर आला की, पुलामध्ये काडीकचरा, गाळ, झाडी-झुडपे अडकून पुराचे पाणी पुलावरून वाहते, बर्‍याच वेळा हे पाणी गावात शिरले, त्यामुळे या पुलाची एक बाजू ढासळून गेली. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना पाण्यात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरूवातीच्या काही वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक उन्हाळ्यात पुलातील गाळ, साचलेला कचरा साफ करून पुलाचे पाइप मोकळे करण्याचा नियमित उपक्रम चालू ठेवला होता; परंतु मागील काही वर्षांंंपासून हा उपक्रम बंद झाला आहे. या ठिकाणी बांधकाम विभागाकडून नवीन पुलासाठी सर्वेक्षण केले होते. ब्रिटिशकाळीन पूल मार्ग                                  नदी                  वर्षमलकापूर - जालना            (आमना)             १९३९मलकापूर - जालना           (खडकपूर्णा)          १९२६जालना - मेहकर               (पैनगंगा)             १९२६ नांदुरा - मोताळा              (विश्‍वगंगा)           १९३३येरली                                (पूर्णा )             १९२६टिवरोडा                            (पूर्णा )             (उपलब्ध नाही )खामगाव - चिखली             (मन)               (उपलब्ध नाही )