शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

बुलडाणा जिल्ह्यातील सात पूल धोकादायक

By admin | Updated: June 24, 2017 05:42 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : पावसाळय़ातील पुरादरम्यान उद्भवते बिकट स्थिती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बर्‍याच वेळा पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आला की, पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे नदी व मार्गावरील पुलनिर्मिती करताना गांभीर्याने पाहिले जाते; परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत ब्रिटिशकाळी २१ पूल असून, त्यापैकी सात पुलांची अवस्था धोकादायक आहे.गावाच्या विकासासाठी शासनाने ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली आहे. शिवाय बरेच पूल १९२६ ते १९३९ या ब्रिटिश काळात बांधण्यात आले आहे. या पुलांची मजबुती कायम ठेवण्यासाठी पुलांची उंची कमी ठेवण्यात आली आहे. नदी-नाल्यांवर निर्माण केलेले पूल मजबूत असणे आवश्यक आहे; मात्र बर्‍याच वेळा पावसात ग्रामीण भागात नदीला पूर आल्यामुळे पुलांच्या सुरक्षा कठड्याची पडझड होऊन नुकसान होते. काही वेळा यामुळे गावाचाही संपर्क तुटतो. बुलडाणा शहर ब्रिटिशकाळात ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत जागरूकता दाखवत ब्रिटिश अधिकार्‍यांनी येथील विविध नद्यांवर अनेक पुलांची निर्मिती केले. यापैकी सद्यस्थितीत सात पुलांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो; मात्र या पुलांची प्रशासनाकडे नियमित देखभाल होत नसल्यामुळे सर्वच पूल जर्जर झाले आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या पुलांवर प्रवास करावा लागतो.धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायकधाड: गत २0 ते २२ वर्षांंंपूर्वी बांधण्यात आलेल्या धाडनजीक बाणगंगा नदीवरील पुलामुळे रहदारी आणि नागरी वस्तीस धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या सुरक्षेबाबत चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कुठलीच उपाययोजना न केल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पाणी या पुलावरून वाहते. शिवाय परिसरातील कचरा पुलात अडकत असल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धाडनजीक धामणगाव धाड रोडवर बाणगंगा नदीवर करडी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या साडव्याचे पाणी ही गावलगत जुन्या फरशी परिसरात येऊन पोहचल्यामुळे त्यावेळी चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईत सिमेंटची पाइप टाकून बाणगंगा नदीवर २0 फूट रुंदीचा आणि साधारण २00 फुटांपेक्षा अधिक लांबीच्या पुलाचा पूल बांधला. पुलाची उंची कमी असल्यामुळे जास्त पाऊस झाला की या पुलापर्यंंंत धरणाचे पाणी येऊन साचले आणि नदीला पूर आला की, पुलामध्ये काडीकचरा, गाळ, झाडी-झुडपे अडकून पुराचे पाणी पुलावरून वाहते, बर्‍याच वेळा हे पाणी गावात शिरले, त्यामुळे या पुलाची एक बाजू ढासळून गेली. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना पाण्यात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरूवातीच्या काही वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक उन्हाळ्यात पुलातील गाळ, साचलेला कचरा साफ करून पुलाचे पाइप मोकळे करण्याचा नियमित उपक्रम चालू ठेवला होता; परंतु मागील काही वर्षांंंपासून हा उपक्रम बंद झाला आहे. या ठिकाणी बांधकाम विभागाकडून नवीन पुलासाठी सर्वेक्षण केले होते. ब्रिटिशकाळीन पूल मार्ग                                  नदी                  वर्षमलकापूर - जालना            (आमना)             १९३९मलकापूर - जालना           (खडकपूर्णा)          १९२६जालना - मेहकर               (पैनगंगा)             १९२६ नांदुरा - मोताळा              (विश्‍वगंगा)           १९३३येरली                                (पूर्णा )             १९२६टिवरोडा                            (पूर्णा )             (उपलब्ध नाही )खामगाव - चिखली             (मन)               (उपलब्ध नाही )