शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संतनगरी राममय!

By admin | Updated: April 16, 2016 02:03 IST

लाखो भक्तांची उपस्थिती; १३0९ भजनी दिंड्यांचा सहभाग.

गजानन कलोरे / शेगाव(जि. बुलडाणा)टाळ, मृदंगाचा गजर, गुलाल, पुष्पांची उधळण करीत सनई-चौघड्यांच्या मंगलमय ध्वनी अन् अडीच लाख भक्तांच्या मुखातून निघणारा रामनामाचा जयघोष, अशा भावविभोर वातावरणात शेगावात श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. लाखो भक्तांच्या मांदियाळीने व तेराशे नऊ भजनी दिंड्यांच्या सहभागाने या सोहळय़ाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ८ एप्रिलपासूनच या सोहळय़ाचा प्रारंभ झाला होता. ११ एप्रिल रोजी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत रामायण स्वाहाकार यागाची सुरुवात झाली होती. त्या यागाची पूर्णाहूती शुक्रवारी सकाळी १0 वा. करण्यात आली. दु पारी श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन झाल्यानंतर ठीक १२ वाजता श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरा तील श्रीरामांच्या मूर्तीसमोर रामजन्माचा पाळणा होऊन भक्तांच्या मुखातून निघणार्‍या रामनामाच्या जयघोषात रामजन्मोत्सवाचे स्वागत करण्यात आले. दुपारी २ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्‍वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींच्या पालखी, वारकर्‍यांना हर हर शिव मंदिर परिसरात किशोर लिप्ते व बसस्थानक परिसरात विश्‍वस्त किशोरबाबू टांक यांनी सरबत दिले. ठिकठिकाणी वारकर्‍यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांनी उत्स्फूर्तपणे केली. श्री गजानन भक्त मंडळींनी दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद व्यवस्था केली होती. श्री गजानन भक्त मंडळ नागपूर, अकोट, शेगाव यांनी दोन दिवस अग्रसेन भवन येथे वारकर्‍यांना महाप्रसाद व्यवस्था केली होती. नागपूर टिमकीच्या भक्तांनी वारकर्‍यांचे जोडे, चपला ठेवण्याची विनामूल्य व्यवस्था केली. शनिवार, १६ एप्रिलला सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी, गोपाल काला होऊन यात्रेची सांगता होईल.