शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

संग्रामपूर: पाच संदिग्ध रूग्णांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटीव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 15:06 IST

तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील पाच संशयीतांचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.गत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील बोडखा, तामगाव, व काकनवाडा या तीन गावातील प्रत्येकी दोन असे सहा नागरीक दिल्ली येथून एका धार्मिक कार्यक्रमातून परतले होते. त्यामुळे तालुका प्रशासनाने सहा पैकी पाच जणांना ३ एप्रिल रोजी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथील विषाणू संशोधक व निदान प्रयोग शाळा सूक्ष्म जिवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल होते. ५ एप्रिल रोजी पाचही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर सहाव्या रूग्णाला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथील रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असता त्याचा पहीला रिपोर्ट ही निगेटिव्ह आला असून दूसरा रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. तसेच दुसºयांदा पाचही संशयित रुग्णांना ८ एप्रिल रोजी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमूने नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानला पाठविण्यात आले असता १० एप्रिल रोजी पाचही संशयित रुग्णाचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. दुसºयांदाही पाचही संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयूर वाडे यांनी दिली आहे. दुसºयांदाही सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. तालुक्यात सद्यास्थिती एकही रुग्ण कोरोना विषाणू बाधित नाही. तरीसुद्धा येथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत घरातच राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहेत.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस