शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

समृद्धी’साठी बुलडाणा जिल्ह्यातील रेती घाट राखीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:58 IST

बुलडाणा : विदर्भाची थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी कनेक्टीव्हीटी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी जिल्ह्यातील ठरावीक रेती घाट राखीव ठेवण्यात येणार आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातून ८७.२९ किमी अंतराचा हा महामार्ग जात असल्याने या रस्त्याच्या कामासाठी नऊ लाख घनमीटर रेतीची गरज ९० टक्के जमीनीचे संपादन होणे आवश्यक असता जिल्ह्यात आतापर्यंत ८२ टक्के जमीनच संपादीत केली गेली आहे.अधीक्षक अभियंत्यांनी (महामार्ग) जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन जिल्ह्यातील रेती घाट या महामार्गाच्या कामासाठी राखीव ठेवण्याबाबत सांगितले आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : विदर्भाची थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी कनेक्टीव्हीटी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी जिल्ह्यातील ठरावीक रेती घाट राखीव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातून ८७.२९ किमी अंतराचा हा महामार्ग जात असल्याने या रस्त्याच्या कामासाठी नऊ लाख घनमीटर रेतीची गरज पडणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेला हे पाऊल उचलावे लागत आहे. महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी किमान ९० टक्के जमीनीचे संपादन होणे आवश्यक असता जिल्ह्यात आतापर्यंत ८२ टक्के जमीनच संपादीत केली गेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जिल्ह्यातील कामास कधी सुरुवात होईल याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे हे मुद्दे घेऊन मुख्यमंत्री २१ मे रोजी व्हीसीद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेणार असल्याने प्रशासकीय पातळीवर समृद्धी महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. समृद्धी महामार्ग हा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा या दोन्ही उपविभागातून गेलेले आहे. या रस्त्याचे काम त्वरेने व्हावे यासाठी डिसेंबर २०१७ मध्येच प्रतीदिन २५ हेक्टर जमीन खरेदीचे उदिष्ठ बुलडाणा जिल्ह्याने ठेवले होते. त्याउपरही मे महिन्याच्या मध्यावर एकुण जमिनीपैकी ८२ टक्के जमीनच महामार्गासाठी संपादीत करण्यात आली आहे. उर्वरित अठरा टक्के जमीनही लवकरच संपादीत करण्यात येत असल्याचे समृद्धी महामार्ग विभागात काम करण्यार्या सुत्रांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी (महामार्ग) जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन जिल्ह्यातील रेती घाट या महामार्गाच्या कामासाठी राखीव ठेवण्याबाबत सांगितले आहे. अद्याप महसूल व भूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील रेती घाटाची पाहणी केलेली नाही. भूजल सर्व्हेक्षण विभाग आणि पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोणते रेती घाट हे रेती उपसा करण्यासाठी उपयुक्त आहे हे स्पष्ट होईल. सोबतच त्यातील कोणते रेती घाट हे समृद्धी महामार्गासाठी राखीव ठेवायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील तीन हजार ८५१ शेतकर्यांची शेत जमीन विशिष्ठ मर्यादेत समृद्धी महामार्गासाठी संपादीत केली जाणार आहे. दीड हजार पेक्षा अधीक शेतकर्यांचे संमतीपत्रही त्यास यापूर्वीच मिळालेले होते. एकूण जवळफास एक हजार २५७ हेक्टर जमीन संपादीत करावयाची असून यातील एक हजार १३६ हेक्टर जमीन ही खासगी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग