शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

समृद्धी’साठी बुलडाणा जिल्ह्यातील रेती घाट राखीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:58 IST

बुलडाणा : विदर्भाची थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी कनेक्टीव्हीटी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी जिल्ह्यातील ठरावीक रेती घाट राखीव ठेवण्यात येणार आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातून ८७.२९ किमी अंतराचा हा महामार्ग जात असल्याने या रस्त्याच्या कामासाठी नऊ लाख घनमीटर रेतीची गरज ९० टक्के जमीनीचे संपादन होणे आवश्यक असता जिल्ह्यात आतापर्यंत ८२ टक्के जमीनच संपादीत केली गेली आहे.अधीक्षक अभियंत्यांनी (महामार्ग) जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन जिल्ह्यातील रेती घाट या महामार्गाच्या कामासाठी राखीव ठेवण्याबाबत सांगितले आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : विदर्भाची थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी कनेक्टीव्हीटी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी जिल्ह्यातील ठरावीक रेती घाट राखीव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातून ८७.२९ किमी अंतराचा हा महामार्ग जात असल्याने या रस्त्याच्या कामासाठी नऊ लाख घनमीटर रेतीची गरज पडणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेला हे पाऊल उचलावे लागत आहे. महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी किमान ९० टक्के जमीनीचे संपादन होणे आवश्यक असता जिल्ह्यात आतापर्यंत ८२ टक्के जमीनच संपादीत केली गेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जिल्ह्यातील कामास कधी सुरुवात होईल याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे हे मुद्दे घेऊन मुख्यमंत्री २१ मे रोजी व्हीसीद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेणार असल्याने प्रशासकीय पातळीवर समृद्धी महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. समृद्धी महामार्ग हा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा या दोन्ही उपविभागातून गेलेले आहे. या रस्त्याचे काम त्वरेने व्हावे यासाठी डिसेंबर २०१७ मध्येच प्रतीदिन २५ हेक्टर जमीन खरेदीचे उदिष्ठ बुलडाणा जिल्ह्याने ठेवले होते. त्याउपरही मे महिन्याच्या मध्यावर एकुण जमिनीपैकी ८२ टक्के जमीनच महामार्गासाठी संपादीत करण्यात आली आहे. उर्वरित अठरा टक्के जमीनही लवकरच संपादीत करण्यात येत असल्याचे समृद्धी महामार्ग विभागात काम करण्यार्या सुत्रांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी (महामार्ग) जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन जिल्ह्यातील रेती घाट या महामार्गाच्या कामासाठी राखीव ठेवण्याबाबत सांगितले आहे. अद्याप महसूल व भूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील रेती घाटाची पाहणी केलेली नाही. भूजल सर्व्हेक्षण विभाग आणि पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोणते रेती घाट हे रेती उपसा करण्यासाठी उपयुक्त आहे हे स्पष्ट होईल. सोबतच त्यातील कोणते रेती घाट हे समृद्धी महामार्गासाठी राखीव ठेवायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील तीन हजार ८५१ शेतकर्यांची शेत जमीन विशिष्ठ मर्यादेत समृद्धी महामार्गासाठी संपादीत केली जाणार आहे. दीड हजार पेक्षा अधीक शेतकर्यांचे संमतीपत्रही त्यास यापूर्वीच मिळालेले होते. एकूण जवळफास एक हजार २५७ हेक्टर जमीन संपादीत करावयाची असून यातील एक हजार १३६ हेक्टर जमीन ही खासगी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग