शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

दीडशे वर्षांपासून होते एकाच गौरीची स्थापना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST

सुधीर चेके पाटील चिखली : राज्यभरात गणरायापाठोपाठ आज गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. महाराष्ट्रात गौरी आगमन ते विसर्जन हा ...

सुधीर चेके पाटील

चिखली : राज्यभरात गणरायापाठोपाठ आज गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. महाराष्ट्रात गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसांचा सण साजरा होत असताना स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा भिन्न असल्या तरी सर्वत्र ज्येष्ठा आणि कनिष्ठा याप्रमाणे दोन गौराईची स्थापना या काळात केल्या जाते. मात्र, केवळ एकाच गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जन करण्याची अनोखी परंपरा सुमारे दीडशे वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील एकलारा (ता. चिखली) येथील पानगोळे कुटुंब जोपासत आहे.

चिखली तालुक्यातील एकलारा येथील पानगोळे परिवाराद्वारे गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून केवळ एकाच गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जन केल्या जात आहे. यामागची कथा मोठी रंजक आहे. या परिवारातील पूर्वज अश्रूजी सखाराम पानगोळे यांच्या काळात सुमारे दीडशे वर्षांपासून गौराईची पारंपरिक पद्धतीने व सर्वसामान्यपणे दोन गौराईंची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेनंतर रात्रीच्यावेळी दोन गौरींपैकी एक अज्ञाताने चोरून नेली. दरम्यान, ही बाब समजल्यानंतर अश्रूजी पानगोळे यांनी घरात राहिलेल्या एका गौरीचीच मनोभावे पूजा व इतर विधी करताना दुसरी गौरी जोपर्यंत परत सापडत नाही तोपर्यंत एकाच गौरीची स्थापना करू, अन्यथा यापुढेही एकाच गौरीची स्थापना करू, असा प्रण केला. त्यापश्चात चोरट्यांचा शोधही घेतला मात्र घरात मनोभावे स्थापन केलेली गौरी चोरून नेत असताना चोरट्यांनी दोन्ही गौरींची चोरी न करता केवळ एकच गौरी का चोरली असावी, याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. परिणामी गौरीची आराधना करतानाच आपल्या पूर्वजांनी घेतलेला पण याचा मान राखत पाळगोळे परिवारातील सर्वांनी हा वारसा जोपासला. सद्यस्थिती विठ्ठल त्र्यंबक पानगोळे यांच्या घरी आजही त्या एकाच गौराईचे आवाहन, पूजन आणि विसर्जन करण्याची परंपरा जोपासली जात आहे.

एकच गौर बसविण्याचे प्रमाण अगदीच नगण्य !

महाराष्ट्रात सर्वत्र गौरी पुजताना प्रामुख्याने गौराईच्या बहिणींच्या जोडीचीच स्थापना केली जाते. यामध्ये एक बहीण मोठी, एक छोटी. ‘ज्येष्ठा आणि कनिष्ठा’, असे स्वरूप असते. तर राज्यात एकच गौर बसविण्याचे प्रमाण राज्यात अगदीच नगण्य मानले जाते. त्यामुळे आपल्या पूर्वजांचा प्रण आणि वडिलोपार्जित वसा जोपासत एकच गौर बसविण्याच्या एकलारा येथील पानगोळे परिवाराची ही परंपरा अनोखी व राज्यातील एकमेव मानली जात आहे.

धातूच्या मुखवट्याचे जतन !

सुमारे दीडशे वर्षांपासून चोरी झाल्यानंतर उरलेल्या एका गौरीचा धातूचा मुखवटा आजही पानगोळे परिवाराने जतन करून ठेवला आहे. परंपरागतपणे धातूचा मुखवटा बसवून त्यांचा साज-शृंगार केला जातो. कालपरत्वे साज-श्रुंगाराच्या इतर साहित्यात बदल झाला असला तरी मुखवटा मात्र आजही तोच आहे. हा मुखवटा पंचधातूचा असावा, असा कयास लावण्यात येतो.