शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे वर्षांपासून होते एकाच गौरीची स्थापना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST

सुधीर चेके पाटील चिखली : राज्यभरात गणरायापाठोपाठ आज गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. महाराष्ट्रात गौरी आगमन ते विसर्जन हा ...

सुधीर चेके पाटील

चिखली : राज्यभरात गणरायापाठोपाठ आज गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. महाराष्ट्रात गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसांचा सण साजरा होत असताना स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा भिन्न असल्या तरी सर्वत्र ज्येष्ठा आणि कनिष्ठा याप्रमाणे दोन गौराईची स्थापना या काळात केल्या जाते. मात्र, केवळ एकाच गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जन करण्याची अनोखी परंपरा सुमारे दीडशे वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील एकलारा (ता. चिखली) येथील पानगोळे कुटुंब जोपासत आहे.

चिखली तालुक्यातील एकलारा येथील पानगोळे परिवाराद्वारे गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून केवळ एकाच गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जन केल्या जात आहे. यामागची कथा मोठी रंजक आहे. या परिवारातील पूर्वज अश्रूजी सखाराम पानगोळे यांच्या काळात सुमारे दीडशे वर्षांपासून गौराईची पारंपरिक पद्धतीने व सर्वसामान्यपणे दोन गौराईंची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेनंतर रात्रीच्यावेळी दोन गौरींपैकी एक अज्ञाताने चोरून नेली. दरम्यान, ही बाब समजल्यानंतर अश्रूजी पानगोळे यांनी घरात राहिलेल्या एका गौरीचीच मनोभावे पूजा व इतर विधी करताना दुसरी गौरी जोपर्यंत परत सापडत नाही तोपर्यंत एकाच गौरीची स्थापना करू, अन्यथा यापुढेही एकाच गौरीची स्थापना करू, असा प्रण केला. त्यापश्चात चोरट्यांचा शोधही घेतला मात्र घरात मनोभावे स्थापन केलेली गौरी चोरून नेत असताना चोरट्यांनी दोन्ही गौरींची चोरी न करता केवळ एकच गौरी का चोरली असावी, याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. परिणामी गौरीची आराधना करतानाच आपल्या पूर्वजांनी घेतलेला पण याचा मान राखत पाळगोळे परिवारातील सर्वांनी हा वारसा जोपासला. सद्यस्थिती विठ्ठल त्र्यंबक पानगोळे यांच्या घरी आजही त्या एकाच गौराईचे आवाहन, पूजन आणि विसर्जन करण्याची परंपरा जोपासली जात आहे.

एकच गौर बसविण्याचे प्रमाण अगदीच नगण्य !

महाराष्ट्रात सर्वत्र गौरी पुजताना प्रामुख्याने गौराईच्या बहिणींच्या जोडीचीच स्थापना केली जाते. यामध्ये एक बहीण मोठी, एक छोटी. ‘ज्येष्ठा आणि कनिष्ठा’, असे स्वरूप असते. तर राज्यात एकच गौर बसविण्याचे प्रमाण राज्यात अगदीच नगण्य मानले जाते. त्यामुळे आपल्या पूर्वजांचा प्रण आणि वडिलोपार्जित वसा जोपासत एकच गौर बसविण्याच्या एकलारा येथील पानगोळे परिवाराची ही परंपरा अनोखी व राज्यातील एकमेव मानली जात आहे.

धातूच्या मुखवट्याचे जतन !

सुमारे दीडशे वर्षांपासून चोरी झाल्यानंतर उरलेल्या एका गौरीचा धातूचा मुखवटा आजही पानगोळे परिवाराने जतन करून ठेवला आहे. परंपरागतपणे धातूचा मुखवटा बसवून त्यांचा साज-शृंगार केला जातो. कालपरत्वे साज-श्रुंगाराच्या इतर साहित्यात बदल झाला असला तरी मुखवटा मात्र आजही तोच आहे. हा मुखवटा पंचधातूचा असावा, असा कयास लावण्यात येतो.