शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

निवडणूक खर्च सादर करण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, निकालही जाहीर करण्यात आले आहेत. आता ९ हजार ...

बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, निकालही जाहीर करण्यात आले आहेत. आता ९ हजार २२९ उमेदवारांना निवडणुकीचा खर्च महिनाभरात सादर करावा लागणार आहे. त्यामुळे विजयीसह पराभूत उमेदवारांनाही खर्चाची माहिती गाेळा करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २८ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत, तसेच ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे आदेश निवडणूक आयाेगाने दिले हाेते. शेवटच्या दिवसात उमेदवारांना बँक खाते उघडण्यात अडचणी आल्या हाेत्या. त्यानंतर निवडणूक आयाेगाने शिथिलता दिली हाेती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्ह्यातील विजयी उमेदवारांसह पराभूत उमदेवारांना निवडणुकीचा खर्च प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. हा खर्च सादर न केल्यास उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांनाही आता निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार आहे. त्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.

८७० ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर हाेणार

ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. सन २०२० ते २०२५ दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या सरपंचपदांचे आरक्षण २७ जानेवारी २०२१ रोजी तहसीलस्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार हे निश्चित करणार आहेत, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रियांकरिता व खुल्या प्रवर्गांतर्गत स्त्रियांकरिता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी रोजी स. ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.

अधिसूचना प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ

ग्रामपंचायत निवडणुकीची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिसूचना जारी करण्याची तारीख २१ जानेवारी हाेती. निवडणूक आयाेगाने यामध्ये मुदतवाढ दिली असून, आता २९ जानेवारीपयर्यंत अधिसूचना जारी करता येणार आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागात लावण्यात आलेली आदर्श आचारसंहिताही संपुष्टात आली आहे.