शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

तेलाच्या मागणीत वाढ, तेल पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ४३६ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख १३ हजार ३६१ ...

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ४३६ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख १३ हजार ३६१ म्हणजे १२० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु यामध्ये गळीतधान्याचे प्रमाण हे अत्यंत कमी दिसून येत आहे. पूर्वी रब्बी हंगामामध्ये जवळपास ६० टक्के क्षेत्रावर सूर्यफूल, जवस, करडी, मोहरी, तीळ आदी गळीतधान्याचे पीक घेतले जात होते. मात्र आता या पिकाला शेतकऱ्यांची पसंती दिसून येत नाही. तेलाच्या मागणीत वाढ होत असताना, शेतकऱ्यांनी तेलपीक घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे गहू व हरभरा हीच पेरणी घेत आहेत. खरीप हंगामात तेवढे सोयाबीनचे पीक घेण्यात येत आहे. मात्र त्यातही गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आला आहे. सोयाबीन पीकही परवडत नसल्याने पिकात फेरबदल करण्याच्या विचारात शेतकरी आहेत.

जवस हद्दपार; करडी, सूर्यफूल, मोहरीचे प्रमाणही घटले

जिल्ह्यात करडी, सूर्यफूल, मोहरी या तेलपीक पेऱ्यात खूप मोठा फरक पडला आहे. जिल्ह्यातील तेल पिकांचा आढावा घेतला असता जवस हे तेलपीक जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. तर सूर्यफूल व मोहरीचे पीकही अत्यंत कमी झाले आहे. या वर्षी सूर्यफुलाची पेरणी अवघी तीन हेक्टर क्षेत्रावरच झाली आहे. जिल्ह्यात गळीतधान्याचे सरासरी क्षेत्र ५५२ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ३२ टक्के म्हणजे १९२ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झालेली आहे.

तेल पिकांपैकी जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. शेतकऱ्यांनी सूर्यफूल, करडी, तीळ यासारखे गळीतधान्याचे पीक घेतले पाहिजे. शेतकऱ्यांनी दरवेळेस तेच ते पीक घेऊ नये. उत्पादन वाढविण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी पिकांमध्ये फेरपालट हा महत्त्वाचा आहे. पूर्वी गळीतधान्य मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते.

- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

मी सध्या मोहरी हे तेलपीक घेतले आहे. परंतु तेलपीक घेणे परवडत नाही. पाऊसही बेभरवशाचा असल्याने गळीतधान्याच्या उत्पादनात नुकसानच सहन करावे लागते. त्यात वेगवेगळ्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव पाहता शेतकरी सूर्यफूल, करडी, तीळ, जवस यांसारख्या पिकांकडे वळत नाहीत. त्यामुळे अलीकडील काळामध्ये तेल पिकामध्ये मोठी घट दिसून येत आहे.

- तनशिराम मानघाले, शेतकरी