शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

तेलाच्या मागणीत वाढ, तेल पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ४३६ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख १३ हजार ३६१ ...

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ४३६ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख १३ हजार ३६१ म्हणजे १२० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु यामध्ये गळीतधान्याचे प्रमाण हे अत्यंत कमी दिसून येत आहे. पूर्वी रब्बी हंगामामध्ये जवळपास ६० टक्के क्षेत्रावर सूर्यफूल, जवस, करडी, मोहरी, तीळ आदी गळीतधान्याचे पीक घेतले जात होते. मात्र आता या पिकाला शेतकऱ्यांची पसंती दिसून येत नाही. तेलाच्या मागणीत वाढ होत असताना, शेतकऱ्यांनी तेलपीक घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे गहू व हरभरा हीच पेरणी घेत आहेत. खरीप हंगामात तेवढे सोयाबीनचे पीक घेण्यात येत आहे. मात्र त्यातही गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आला आहे. सोयाबीन पीकही परवडत नसल्याने पिकात फेरबदल करण्याच्या विचारात शेतकरी आहेत.

जवस हद्दपार; करडी, सूर्यफूल, मोहरीचे प्रमाणही घटले

जिल्ह्यात करडी, सूर्यफूल, मोहरी या तेलपीक पेऱ्यात खूप मोठा फरक पडला आहे. जिल्ह्यातील तेल पिकांचा आढावा घेतला असता जवस हे तेलपीक जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. तर सूर्यफूल व मोहरीचे पीकही अत्यंत कमी झाले आहे. या वर्षी सूर्यफुलाची पेरणी अवघी तीन हेक्टर क्षेत्रावरच झाली आहे. जिल्ह्यात गळीतधान्याचे सरासरी क्षेत्र ५५२ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ३२ टक्के म्हणजे १९२ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झालेली आहे.

तेल पिकांपैकी जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. शेतकऱ्यांनी सूर्यफूल, करडी, तीळ यासारखे गळीतधान्याचे पीक घेतले पाहिजे. शेतकऱ्यांनी दरवेळेस तेच ते पीक घेऊ नये. उत्पादन वाढविण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी पिकांमध्ये फेरपालट हा महत्त्वाचा आहे. पूर्वी गळीतधान्य मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते.

- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

मी सध्या मोहरी हे तेलपीक घेतले आहे. परंतु तेलपीक घेणे परवडत नाही. पाऊसही बेभरवशाचा असल्याने गळीतधान्याच्या उत्पादनात नुकसानच सहन करावे लागते. त्यात वेगवेगळ्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव पाहता शेतकरी सूर्यफूल, करडी, तीळ, जवस यांसारख्या पिकांकडे वळत नाहीत. त्यामुळे अलीकडील काळामध्ये तेल पिकामध्ये मोठी घट दिसून येत आहे.

- तनशिराम मानघाले, शेतकरी