शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तेलाच्या मागणीत वाढ, तेल पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ४३६ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख १३ हजार ३६१ ...

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ४३६ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख १३ हजार ३६१ म्हणजे १२० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु यामध्ये गळीतधान्याचे प्रमाण हे अत्यंत कमी दिसून येत आहे. पूर्वी रब्बी हंगामामध्ये जवळपास ६० टक्के क्षेत्रावर सूर्यफूल, जवस, करडी, मोहरी, तीळ आदी गळीतधान्याचे पीक घेतले जात होते. मात्र आता या पिकाला शेतकऱ्यांची पसंती दिसून येत नाही. तेलाच्या मागणीत वाढ होत असताना, शेतकऱ्यांनी तेलपीक घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे गहू व हरभरा हीच पेरणी घेत आहेत. खरीप हंगामात तेवढे सोयाबीनचे पीक घेण्यात येत आहे. मात्र त्यातही गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आला आहे. सोयाबीन पीकही परवडत नसल्याने पिकात फेरबदल करण्याच्या विचारात शेतकरी आहेत.

जवस हद्दपार; करडी, सूर्यफूल, मोहरीचे प्रमाणही घटले

जिल्ह्यात करडी, सूर्यफूल, मोहरी या तेलपीक पेऱ्यात खूप मोठा फरक पडला आहे. जिल्ह्यातील तेल पिकांचा आढावा घेतला असता जवस हे तेलपीक जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. तर सूर्यफूल व मोहरीचे पीकही अत्यंत कमी झाले आहे. या वर्षी सूर्यफुलाची पेरणी अवघी तीन हेक्टर क्षेत्रावरच झाली आहे. जिल्ह्यात गळीतधान्याचे सरासरी क्षेत्र ५५२ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ३२ टक्के म्हणजे १९२ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झालेली आहे.

तेल पिकांपैकी जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. शेतकऱ्यांनी सूर्यफूल, करडी, तीळ यासारखे गळीतधान्याचे पीक घेतले पाहिजे. शेतकऱ्यांनी दरवेळेस तेच ते पीक घेऊ नये. उत्पादन वाढविण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी पिकांमध्ये फेरपालट हा महत्त्वाचा आहे. पूर्वी गळीतधान्य मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते.

- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

मी सध्या मोहरी हे तेलपीक घेतले आहे. परंतु तेलपीक घेणे परवडत नाही. पाऊसही बेभरवशाचा असल्याने गळीतधान्याच्या उत्पादनात नुकसानच सहन करावे लागते. त्यात वेगवेगळ्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव पाहता शेतकरी सूर्यफूल, करडी, तीळ, जवस यांसारख्या पिकांकडे वळत नाहीत. त्यामुळे अलीकडील काळामध्ये तेल पिकामध्ये मोठी घट दिसून येत आहे.

- तनशिराम मानघाले, शेतकरी