शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

परतीच्या पावसाचा फटका; हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 13:44 IST

परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन, ज्वारीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन व ज्वारीला तर हिरवेकच्च कोंब आलेले आहेत. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे.जिल्ह्यात सात लाख २९ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षी सुरूवातीला पावसाचे चिन्ह चांगले असल्याने कृषी विभागाच्या नियोजनानूसार जिल्ह्यात १०३ टक्के पेरा झाला. गेल्या १५ दिवसांपासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतू परतीच्या पावसाने सोयाबीन काढणीला मोठा खोडा निर्माण केला आहे. ज्या ठिकाणी सोयाबीन सोंगणी झाली, त्यांनी शेतातच सुडी लावलेली आहे. परंतू या पावसामुळे सोयाबीन सुडीलाच फटका बसत आहे. सुडी लावलेल्या सोयाबीनला कोंब आल्याने त्याचे नुकसान होत आहे. तर शेतात उभ्या असलेल्या ज्वारी पिकासाठी सुद्धा हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. ज्वारीच्या कणसाला कोंब येत असल्याचे दिसून येत आहे. परतीच्या पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.कपाशीचे बोंडही झाले खराबजिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २७३ हेक्टर आहे. त्यापैकी २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरा झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात नियोजित क्षेत्रापैकी १०७ टक्के कापूस लागवड आहे. परंतू परतीच्या पावसाने हे कापूस पीक धोक्यात सापडले आहे. सोयाबीन पाठोपाठ कपाशी पीक घेतले जाते. जिल्ह्यात कपाशी उत्पादक शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतू अतिपावसाने कापासाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतात असलेली कापासाची बोंडे खराब झालेली दिसून येत आहेत.

‘शेतकºयांना तातडीने मदत द्या’परतीच्या पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, ज्वारी, कपाशी उत्पादक शेतकरी संकटात आहे. काही शेतकºयांना शेतात लागलेली सोयाबीन सुडी काढूण आणणे अवघड झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी साचलेले असल्याने सोयाबीन सोंगता येत नाही. नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.

- नामदेवराव जाधव, शेतकरी नेते, शेतकरी संघटना.

नुकसानग्रस्त भागाचा सर्वे सुरू आहेज्या शेतकºयांची सोयाबीन अद्याप शेतात आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. सोयाबीन व ज्वारी पिकाला मोड आलेले आहेत. कापूस पिकाचे काहीच ठिकाणी नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाज घेणे पूर्ण झाले असून, आता नुकसानग्रस्त भागात सर्वे करण्यात येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्वेला वेग येईल.

- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी