शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

परतीचा पाऊस; खरीप पीकाचे ५० टक्के नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:04 IST

परतीच्या पावसामुळे यापैकी निम्म्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नेमक्या सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने कहर केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील खरीपातील पिकांचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला असून येत्या चार दिवसात या नुकसानाचे युद्धस्तरावर पंचनामे करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस झाला आहे. जेथे आॅक्टोबर हीट खरीपाची तयार झालेली पिके सुकण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याच काळात नेमका परतीचा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात सोंगून ठेवलेल्या पिकांना चक्क कोंब आले आहेत. पावसामुळे शेतातच आडवे पडलेल्या ज्वारीच्या कणसांनाही कोंब आल्याने शेतकरी वर्ग मोठा अडचणीत आला आहे. २०१३-१४ हे वर्ष वगळता जिल्ह्यात सातत्याने अवर्षण व अवर्षणसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. यावर्षी मात्र वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस जादा पडला आहे. मात्र शेवट्या टप्प्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. जिल्ह्यात सात लाख २९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दरवर्षी खरीपाची पेरणी होत असते.यंदा वेळेत व नियमित स्वरुपात पाऊस पडला. नजर अंदाजमध्येही जिल्ह्याची पैसेवारी ही ७१ पैश्याच्या आसपास आली आहे. आता परतीच्या पावसामुळे सुधारीत पैशेवारीमध्ये काय फरक पडतो याकडे प्रशासनाचे लक्ष लागून आहे.सुधारीत पैसेवारीला गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसू शकतो, असाही अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने खरीपात सोयाबीन तीन लाख ६१ हजार ५३५ हेक्टरवर, दोन लाख १३ हजार १८७ हेक्टरवर कपाशी, एक लाख ४८२ हेक्टरवर ज्वारी, ७६ हजार ५०७ हेक्टरवर तूर आणि २५ हजार ४० हेक्टरवर मका पीकाचा पेरा झाला होता परतीच्या पावसामुळे यापैकी निम्म्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.परतीच्या पावसापूर्वी शेतकºयांनी सोयाबीनसह उडीद, मूगासह अन्य पीके सोंगून शेतातच सुडी लावून ठेवली होती. पावसामुळे ही पीके खराब झाली असून बुहतांश पिकांना कोंब फुटल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.रब्बीवर शेतकºयांची भिस्तखरीपाचे हातातोंडाशी आलेल पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी हवालदील आहे. मात्र वार्षिक सरासरीच्या ११३ टक्के पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचे पीक चांगले येण्याचा अनुमान असून त्यादृष्टीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ऐरवी रब्बीचा जमीनीतील ओलाव्याचा आधार घेत शेतकरी जुगार खेळत होता. आता हे पीक चांगले येईल अशी आस शेतकºयांना असल्याचे चित्र आहे. पीक विम्या सोबतच राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातूनही शेतकºयांना येत्या काळात मदत मिळण्याचे संकेत जिल्ह्याचे काळजीवाहू पालकमंत्री डॉ. संजय कुटे २८ आॅक्टोबर रोजीच दिले आहेत. दरम्यान, रब्बीचा पेराही यंदा वाढण्याची आशा प्रशासनाला आहे.

परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान पाहता प्राथमिक अंदाज घेण्यात आला असून जवळपास ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या चार दिवसात पीक नुकसानाचा पंचनामा पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.-नरेंद्र नाईक,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी