शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

परतीचा पाऊस; खरीप पीकाचे ५० टक्के नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:04 IST

परतीच्या पावसामुळे यापैकी निम्म्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नेमक्या सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने कहर केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील खरीपातील पिकांचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला असून येत्या चार दिवसात या नुकसानाचे युद्धस्तरावर पंचनामे करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस झाला आहे. जेथे आॅक्टोबर हीट खरीपाची तयार झालेली पिके सुकण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याच काळात नेमका परतीचा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात सोंगून ठेवलेल्या पिकांना चक्क कोंब आले आहेत. पावसामुळे शेतातच आडवे पडलेल्या ज्वारीच्या कणसांनाही कोंब आल्याने शेतकरी वर्ग मोठा अडचणीत आला आहे. २०१३-१४ हे वर्ष वगळता जिल्ह्यात सातत्याने अवर्षण व अवर्षणसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. यावर्षी मात्र वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस जादा पडला आहे. मात्र शेवट्या टप्प्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. जिल्ह्यात सात लाख २९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दरवर्षी खरीपाची पेरणी होत असते.यंदा वेळेत व नियमित स्वरुपात पाऊस पडला. नजर अंदाजमध्येही जिल्ह्याची पैसेवारी ही ७१ पैश्याच्या आसपास आली आहे. आता परतीच्या पावसामुळे सुधारीत पैशेवारीमध्ये काय फरक पडतो याकडे प्रशासनाचे लक्ष लागून आहे.सुधारीत पैसेवारीला गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसू शकतो, असाही अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने खरीपात सोयाबीन तीन लाख ६१ हजार ५३५ हेक्टरवर, दोन लाख १३ हजार १८७ हेक्टरवर कपाशी, एक लाख ४८२ हेक्टरवर ज्वारी, ७६ हजार ५०७ हेक्टरवर तूर आणि २५ हजार ४० हेक्टरवर मका पीकाचा पेरा झाला होता परतीच्या पावसामुळे यापैकी निम्म्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.परतीच्या पावसापूर्वी शेतकºयांनी सोयाबीनसह उडीद, मूगासह अन्य पीके सोंगून शेतातच सुडी लावून ठेवली होती. पावसामुळे ही पीके खराब झाली असून बुहतांश पिकांना कोंब फुटल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.रब्बीवर शेतकºयांची भिस्तखरीपाचे हातातोंडाशी आलेल पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी हवालदील आहे. मात्र वार्षिक सरासरीच्या ११३ टक्के पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचे पीक चांगले येण्याचा अनुमान असून त्यादृष्टीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ऐरवी रब्बीचा जमीनीतील ओलाव्याचा आधार घेत शेतकरी जुगार खेळत होता. आता हे पीक चांगले येईल अशी आस शेतकºयांना असल्याचे चित्र आहे. पीक विम्या सोबतच राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातूनही शेतकºयांना येत्या काळात मदत मिळण्याचे संकेत जिल्ह्याचे काळजीवाहू पालकमंत्री डॉ. संजय कुटे २८ आॅक्टोबर रोजीच दिले आहेत. दरम्यान, रब्बीचा पेराही यंदा वाढण्याची आशा प्रशासनाला आहे.

परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान पाहता प्राथमिक अंदाज घेण्यात आला असून जवळपास ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या चार दिवसात पीक नुकसानाचा पंचनामा पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.-नरेंद्र नाईक,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी