शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

कोरोनाच्या नावावर लावलेल्या निर्बंधांचा फेरविचार करा : आ. श्वेता महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:35 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाने मानवी जीवन धोक्यात सापडले असून, या संकटासोबतच सुलतानी संकटाने नागरिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाने मानवी जीवन धोक्यात सापडले असून, या संकटासोबतच सुलतानी संकटाने नागरिक त्रस्त आहेत. कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनसदृश निर्बंध लावल्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असल्याने सद्य:स्थितीतील निर्बंधांचा फेरविचार करून मजूर, कामगार, व्यापारी, लघु उद्योजक, गॅरेज मालक, सलून, हॉटेल व्यावसायिक या व इतर लहान-मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ६ एप्रिल रोजी आमदार श्वेता महाले यांची भेट घेऊन लॉकडाऊनला विरोध दर्शविला. यानुषंगाने आ. महाले यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना पत्र लिहून यासंदर्भातील निर्बंधांचा सर्वसमावेशक फेरविचार करण्याची मागणी केली आहे. अगोदरच कोरोनाचा मार, त्यात प्रशासनाचा भार, अशी परिस्थिती नागरिकांवर उद्भवलेली आहे. लॉकडाऊन जरी केले नसले तरी लावलेले निर्बंध हे लॉकडाऊनचीच आठवण करून देणारे आहेत. शनिवार, रविवार या दोन दिवसांचा लॉकडाऊन नागरिक सहन करू शकतात; परंतु इतर पाचही दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आले, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत आहेत, प्रशासनाने निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार केलेला नाही. या निर्बंधांचा अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थाही यामुळे खिळखिळी होणार आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय, अशा सर्व घटकांतील व्यावसायिक बेरोजगार होणार आहेत. शिवाय वाहतूक सुरू असली तरी गॅरेज आणि स्पेअर पार्टस्‌ दुकाने मात्र बंद ठेवण्यात आल्याने वाहने नादुरुस्त झाल्यास स्पेअर पार्ट न मिळाल्याने व दुरुस्ती न झाल्याने ट्रान्सपोर्टसुद्धा बंद राहणार आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासोबतच अर्थकारण बंद होणार नाही, तसेच हातावर पोट असणारे मजूर, कामगार, बांधकाम क्षेत्रातील बांधकाम साहित्य पुरविणारी दुकाने बंद झाल्याने बांधकाम मजुरांची उपासमार होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करून आ. श्वेता महाले यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, व्यापारी, लघु व्यावसायिक, तसेच इतर घटकांशी चर्चा करून निर्बंध लावण्याबाबत फेरविचार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आ. श्वेता महाले यांनी केली आहे.