शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सायकल वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प - प्रल्हाद अण्णा भांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 16:13 IST

Nashik To Shegaon नाशिक-शेगाव सायकलवारीचे प्रणेते प्रल्हाद अण्णा भांड यांच्याशी साधलेला संवाद.

ठळक मुद्देसन-२००० साली नाशिक-शेगाव सायकल यात्रेला सुरूवात करण्यात आली.भक्तीतून शक्तीकडे अशी ही सायकल वारीची वाटचाल सुरू आहे.

-  अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  सायकल वारीतून भक्ती आणि शक्ती वृध्दींगत होण्यास मदत  होते. या वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प असून पर्यावरण रक्षणासाठीच नाशिक-शेगाव  सायकल यात्रा आयोजित केली जाते. नाशिक-शेगाव सायकलवारीचे प्रणेते प्रल्हाद अण्णा भांड यांच्याशी साधलेला संवाद.नाशिक-शेगाव सायकल यात्रेला कधीपासून सुरूवात केली?वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पर्याय म्हणून सायकल वापरण्यास सुरूवात केली. सायकल वापरण्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम दिसायला लागले. त्यानंतर सायकल-डे ही संकल्पना राबविली. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील तीर्थ स्थळांना भेटी देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर सन-२००० साली नाशिक-शेगाव सायकल यात्रेला सुरूवात करण्यात आली.

सायकल वारीतील वाढत्या सहभागाबाबत काय सांगाल?सुरूवातीला मित्र मंडळीत सायकल वापरण्याचे महत्व पटवून दिले. आरोग्याचे महत्व पटलेले काही जण सुरूवातीला सोबत जुळले. त्यानंतर अनेकांना सायकल वापरण्याची अनुभूती आली. अनेकांची श्रध्दा वृध्दीगंत होण्यासही मदत झाली. त्यामुळे आता एक मोठी टीम तयार झाली. आता मै अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर लोग साथ आते गऐ और कारवॉ बनता गया असाच प्रत्यय शेगाव-नाशिक सायकल वारीत येत आहे. महाराष्ट्रातील पहिली सायकल वारी सुरू केल्याचे समाधानही आहे.

सायकल वारीच्या आजपर्यंतच्या उपलब्धी बाबत काय सांगाल?आजच्या धकाधकीच्या जीवनात   पंढरपूर-आळंदी-शेगाव पायदळ वारी करणे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे अध्यात्मातून विज्ञानाकडे भक्तीतून शक्तीकडे अशी ही सायकल वारीची वाटचाल सुरू आहे. या वारीत अनेक जण दिवसेंदिवस जुळत आहेत. वारीत अनेकांचा सहभाग वाढत आहे. नाशिक-शेगावपर्यंत अनेकांशी ऋणानुबंध वृध्दीगंत होत आहे. ही मोठी उपलब्धी या सायकल वारीची आहे.

 नाशिक-शेगाव सायकलवारीतून समाजाला संदेश काय?विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांनी आपल्या चमत्कारातून अन्न वाया न जाऊ देण्याचा मंत्र दिला आहे. महाराजांनी जीवदयेचाही मंत्र दिला आहे. या मंत्राचा प्रत्येकाने अंगिकार करावा. पर्यावरण रक्षणाची कास धरावी. थोडक्यात, सर्व धर्मांची एकच शिकवण, पर्यावरणाचे करा रक्षण, हाच संदेश आपला या सायकलवारी द्वारे  प्रामुख्याने युवक वर्गांसह संपूर्ण समाज बांधवांना राहणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावNashikनाशिकShegaonशेगाव