शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जलाशये कोरडी; ग्रामीण भागात पाणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 15:35 IST

खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावा-गावात पाण्यासाठी महिलांसह नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे तसेच विहिरी अधिग्रहित करून पाण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र अधिग्रहित केलेल्या विहिरीही आटत आहेत. उपलब्ध करून देण्यात येत असलेले पाणी कमी पडत आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरांचीही तीच अवस्था आहे. अशा अवस्थेत अनेक सामाजिक संघटनांकडून टँकरने मोफत पाणी वाटप करण्यात येत असून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत आहे.जवळच असलेल्या दुर्गादैत्य येथे पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. येथील मुख्य पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी, बोरवेल, हातपंप आटले असून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.वानखेडसह दुर्गादैत्य परिसरात पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक ग्राम पंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुर्गादैत्य वासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष करून महिलांचे अतिशय हाल होत आहेत.गावात लाखो रुपये खर्च करुन आणलेली महाजल योजना कुचकामी ठरली असल्याचे दिसून येत आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असले, तरी पाईपलाईन अभावी हे काम रखडले आहे. सध्या गावाच्या मुख्य रस्त्यावरुन वानखेडकडे जाणाऱ्या पाईपलाईनच्या लिकेजद्वारे निघणाºया पाण्यावर नागरिक आपली तहान भागवत आहेत. आणखी १ महिना नागरिकांना काढावा लागणार आहे. त्यामुळे पाणी समस्या निकाली काढण्याची गरज आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई