शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिलासादायक : संग्रामपूर तालुक्यातील पाचही व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:35 IST

दिलासादायक : संग्रामपूर तालुक्यातील पाचही व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

संग्रामपूर - पंधरा दिवसापूर्वी दिल्लीहून परतलेल्या सहा जणांपैकी पाच जणांना शेगाव येथे तर एकाला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये बोडखा, काकनवाडा, तामगाव येथील प्रत्येकी दोन दोन व्यक्तीचा समावेश आहे. या सहा पैकी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात 5 नागरिकांना क्वारंटाईन करून त्यांच्या घश्याचे नमुने औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते. त्या पाचही लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. तालुक्यातील बोडखा येथील दोन, तामगाव येथील दोन तर काकनवाडा येथील एकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी मयूर वाडे यांनी सांगितले आहे. तसेच अंजनगाव येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्याची माहीती कळू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिल्ली येथे कार्यक्रमांमध्ये हे सहा जण सहभागी होते. तालुका प्रशासनाने यातील पाच लोकांना शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्या पाचही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संग्रामपूर तालुक्यात सध्यातरी कोरोणा विषाणूची बाधीत एकही रुग्ण नसल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यात अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन ही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangrampurसंग्रामपूर