शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

खळवाडीसाठी जमिनीच्या अदलाबदलीला मान्यता

By admin | Updated: April 15, 2017 01:07 IST

शेगाव विकास आराखडा : खळवाडी अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

फहीम देशमुख - शेगावमागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खळवाडीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. खळवाडी येथील २.६७ हे.आर. जमिनीच्या बदल्यात संस्थानच्या मालकीच्या असलेल्या अकोट रोडवरील ४.४५ हे.आर जमिनीच्या अदलाबदलीस महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंजुरात प्रदान केली आहे. यामुळे आता येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेगाव विकास आराखड्यांतर्गत ५०० कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला आहे. मागील सात वर्षात आतापर्यंत ५० टक्के कामे झालेली असून, कामांची गती अत्यंत संथ व नागरिकांसाठी त्रासदायक असल्याने शहरवासी त्रस्त आहेत. अशातच श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहने ठेवण्यासाठी १०० वर्षांपासून राहणाऱ्या खळवाडीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. गांधी चौकापासून सुरुवात होणाऱ्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दोन मोरी व बालाजी फैलापर्यंत २.६७ हे. आर. जमीन शासन श्री संत गजानन महाराज संस्थानला बहुमजली वाहन तळासाठी देण्यास तयार झाली आहे. याकरिता सर्व औपचारिकता पूर्ण झालेली असून, तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महसूल व वन विभाग मंत्रालयाने ५ एप्रिल २०१७ रोजी खळवाडी येथील २.६७ हे.आर. जमिनीच्या बदल्यात गजानन महाराज संस्थानच्या मालकीच्या शेगाव-अकोट रोडवरील भूमापन क्र. ७८७/३, ७८८/२, ७९१, ७९२, ७९३/१, ७९३/३, ७९४/१ व ७१४/१ व ७१५/१ मधील ४.४५ हे.आर. जमीन खळवाडी येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनासाठी अदलाबदली करण्याच्या प्रक्रियेला शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता खळवाडी येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.दुसरीकडे येथील नागरिकांचा पुनर्वसनाला प्रखर विरोध आहे. यामध्ये या भागाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी कुठल्याही परिस्थितीत खळवाडीतील पुनर्वसन होऊ देणार नाही, असे जाहीर केलेले आहे. मात्र, त्यांच्याच शासनाने या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देऊ केली असल्याने आता येथील नागरिकांचे लक्ष आ.कुटे यांच्या पुढील पावलाकडे लागून आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव स.चं. मोंडकर यांनी काढलेल्या पत्रकानुसार राज्यातील सर्व संबंधित विभागाने तत्काळ पुढील कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. शेगावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी७० हजार लोकसंख्येच्या या शहरात श्री संत गजानन महाराजांचे मंदिर असल्याने देशभरातील भाविक व आनंद सागर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या शहरात येतात. मात्र, रेल्वे स्थानक ते गजानन महाराज मंदिर याच १ कि.मी.च्या मार्गावर सर्व व्यवसाय व वर्दळ राहत असल्याने या भागातील जागांना खूप मागणी आहे. अशातच याच मुख्य मार्गालगतच्या खळवाडीची जागा शासन वाहनतळासाठी देत असल्याने नागरिकांची तीव्र नाराजी आहे. शहराबाहेरील एखादी जागा शासनाने वाहनतळासाठी द्यावी, अशी मागणी होत आहे.