शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वास्तववादी कवितांनी रसिक भारावले!

By admin | Updated: March 14, 2016 01:45 IST

कवींनी सादर केल्या विविधरंगी भावनांच्या कविता.

बुलडाणा : अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये जास्तीत जास्त हृदयस्पश्री आशय सांगणार्‍या व तितक्याच पोटतिडीकीने समाजाचे वास्तव मांडणार्‍या कविता सादर करून विविध कवींनी बुलडाणेकर रसिकांना भावरंगाच्या वर्षावात चिंब केल्याचे चित्र संत चोखामेळा साहित्य नगरीत दिसून आले.स्थानीय गर्दे वाचनालयातील संत चोखामेळा साहित्य नगरीत संमेलनाच्या सातव्या सत्रात १३ मार्च रोजी कविसंमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर होते. प्रमुख पाहुणो म्हणून आपल्या ग्रामीण भागातील कवितांनी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे लोककवी विठ्ठल वाघ हे होते. विचारपीठावर कवी प्रशांत असनारे, अशोक कोतवाल, नारायण जाधव येळगावकर, सुरेश साबळे, सुभाष किन्होळकर, श्रीरंजन आवटे, गोविंद गायकी, अमरचंद कोठारी, प्रेषित सिद्धभट्टी, किरण डोंगरदिवे, सचिन कापसे, गोपाल वाकोडे, रवींद्र साळवे, संजय भारती, किशोर बळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कविसंमेलनाची सुरुवात लोककवी विठ्ठल वाघ यांनी आपल्या खास वर्‍हाडी भाषेतील शैलीने केली. त्यानंतर प्रशांत असनारे यांनी ह्यमाझी मुलगी पावसाचं चित्र काढते..ह्ण ही कविता सादर केली. या कवितेतून त्यांनी आजच्या वास्तविक स्थितीचे सुंदर विेषण केले. अशोक कोतवाल यांनी ह्यमनोगत शाळेच्या मधल्या सुटीतून पळून जाणार्‍या मुलाचेह्ण ही कविता सादर केली, तेव्हा शिक्षण क्षेत्रातील चित्र उपस्थित रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभे झाले. नारायण जाधव येळगावकर यांनी ह्यया गाऊया गड्यांनो गीत-गाणी पावसाचीह्ण या गीताची सुरुवात करताच उपस्थित बालरसिकांच्या मनाचा ठाव घेतला गेला. सुरेश साबळे यांनी ह्यचळवळ, चौक आणि कार्यकर्ताह्ण या कवितेतून आजच्या भरकटलेल्या चळवळींचा वास्तवदश्री आढावा मांडला. उपस्थित बालरसिकांना भावली ती सुभाष किन्होळकरांची ह्यचिंगी-भिंगी, चिंगी-भिंगी दोन बहिणी, दोन रंगी दोन ढंगीह्ण कविता. आदिवासी-ग्रामीण जीवनाचे चित्र रंगवणार्‍या कवितांसाठी प्रसिद्ध असणार्‍या प्रा. डॉ. गोविंद गायकी यांनी ह्यएक पाकोडी पाकोडीह्ण या कवितेची तान धरताच उपस्थितांनी टाळ्यांचा वर्षाव केला. अमरचंद कोठारी यांनीदेखील मामा-मावशीच्या गावाला गेलेल्या छोट्या मुला-मुलींच्या भावभावना आपल्या सुंदर कवितेतून मांडल्या. प्रेषित सिद्धभट्टी यांनी ह्यकत्तलखान्यातील अखेरचे श्‍वासह्ण ही कविता सादर केली. सचिन कापसे यांनी आपल्या कवितेतून विचारा-विचारांमधील तफावत आणि त्यातून होणारे वैचारिक द्वंद तसेच माणसा-माणसातील वाढत जाणार्‍या अंतराबाबतचे चित्र आपल्या कवितेतून सुरेखपणे मांडले. गोपाल वाकोडे यांनी शेतात काम करणार्‍या एका आईचे चित्रण करणारी कविता ह्यपर्‍हाटीच्या वावरात माही माय कापूस वेचतेह्ण सादर केली. किरण डोंगरदिवे यांनी शाळेच्या समोर बोरं विकणार्‍या वृद्ध आजीची व्यथा कथन केली. रवींद्र साळवे यांनी तर नोकरीला लागलेल्या एका मध्यमवर्गीय पुरुषाची हृदयस्पश्री स्थिती स्पष्ट केली. संजय भारती यांनी कवितेतून दुष्काळाची व्यथा मांडली. संचालन करणारे ग्रामीण कवी किशोर बळी यांनीदेखील ह्यघाव होतील पावलो पावली, वार होतील ठायी ठायीह्ण ही शेतकर्‍यांमध्ये आत्मबळ जागविणारी कविता, तर आयुक्त भापकर यांनी शिक्षणापासून वंचित व बालमजुरीत अडकलेल्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडणारी कविता सादर केली.