शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

ऐन सण- उत्सवांच्या काळात पावसाचा फुलशेतीला फटका, भावात दुपटीने वाढ 

By विवेक चांदुरकर | Updated: September 18, 2023 13:57 IST

फळांच्या भावातही वाढ

खामगाव : गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फूलशेतीला मोठा फटका बसला आहे. हरतालिका व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक घटली असून, भावातही दुपटीने वाढ झाली आहे. डाळींबाचे दर तिप्पट झाले आहेत. पूर्वी ७० ते ७५ रूपये किलो असलेल्या डाळींबाचे दर आता २०० रूपये किलो झाले आहेत.  

शुक्रवार, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे फुल उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे फुले सडली आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी झेंडू, गुलाब, लिलीसह फुलांची शेती करतात. तसेच खामगावात पुणे, नाशिकसह अन्य शहरातून फुले मागविण्यात येतात. सण उत्सवांच्या काळात फुलांना चांगली मागणी असते. या दिवसांमध्ये चांगली विक्री होते. त्या आशेवर शेतकरी असतात. मात्र, पावसाने फुले झाडांनाच काळी पडली आहेत. 

तसेच फुले सडली असल्याने शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. झेंडूची फुले २०० रूपये किलो, गुलाबाचे फूल पाच रूपयांना एक मिळत आहे. तर शेवंतीचे दर २५० रूपये किलो झाले आहेत. लिलीच्या ५० फुलांची गड्डी १०० रूपयांना मिळत आहे. तसेच फळांच्या दरातही वाढ झाली आहे. डाळींबाची आवक घटली असून, दरही वाढले आहेत. एक महिन्याआधी ७० ते ७५ रूपये किलो असलेल्या डाळींबाचे दर २०० रूपये किलो झाले आहेत. केळी ४० ते ५० रूपयांना एक डझन, सेफ १२० रूपये किलो, चिकूचे दर १२० रूपये किलो झाले आहेत. चिकुच्या दरातही ३० ते ४० रूपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाइचा ग्राहकांना फटका बसत आहे.

खामगाव शहरात ग्राहकांची गर्दी हरतालिका व गणेश उत्सवासाठी खरेदी करण्याकरिता खामगाव शहरातील अग्रसेन चाैक, मुख्य बाजार लाइन, फरशी परिसर, जलंब नाका परिसरात ग्राहकांची गर्दी झाली होती. पोलिस स्टेशनपासून तर फरशी परिसरपर्यंत हरतालिकासाठी लागणार्या विविध वनस्पतींची विक्री करणारी दुकाने लागली होती. ग्रामीण भागातील महिलांनी केळीची पाने, सिताफळसह विविध वनस्पती विक्रीसाठी आणल्या होत्या. सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी ४ वाजेपर्यंत शहरात ठिकठिकाणी दुकाने लागली होती. सण उत्सवामुळे फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.   

शेतकरी व ग्राहकांना फटका  पावसामुळे फूल उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. फुले झाडालाच काळी पडली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्च करून शेतकर्यांना आवक घटडली असल्याने भाववाढ झाली आहे. भाव वाढल्याने ग्राहकांनाही फटका बसत आहे.   पावसाने फुलांचे नुकसान झाले आहे. फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचा फायदा शेतकर्यांना कमी तर व्यापार्यांनाच जास्त होत आहे. ग्राहकांनाही त्याचा फटका बसत आहे.  - पदमाकर खुमकरफुल उत्पादक शेतकरी, जलंब

टॅग्स :buldhanaबुलडाणाfruitsफळे