शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

ऐन सण- उत्सवांच्या काळात पावसाचा फुलशेतीला फटका, भावात दुपटीने वाढ 

By विवेक चांदुरकर | Updated: September 18, 2023 13:57 IST

फळांच्या भावातही वाढ

खामगाव : गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फूलशेतीला मोठा फटका बसला आहे. हरतालिका व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक घटली असून, भावातही दुपटीने वाढ झाली आहे. डाळींबाचे दर तिप्पट झाले आहेत. पूर्वी ७० ते ७५ रूपये किलो असलेल्या डाळींबाचे दर आता २०० रूपये किलो झाले आहेत.  

शुक्रवार, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे फुल उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे फुले सडली आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी झेंडू, गुलाब, लिलीसह फुलांची शेती करतात. तसेच खामगावात पुणे, नाशिकसह अन्य शहरातून फुले मागविण्यात येतात. सण उत्सवांच्या काळात फुलांना चांगली मागणी असते. या दिवसांमध्ये चांगली विक्री होते. त्या आशेवर शेतकरी असतात. मात्र, पावसाने फुले झाडांनाच काळी पडली आहेत. 

तसेच फुले सडली असल्याने शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. झेंडूची फुले २०० रूपये किलो, गुलाबाचे फूल पाच रूपयांना एक मिळत आहे. तर शेवंतीचे दर २५० रूपये किलो झाले आहेत. लिलीच्या ५० फुलांची गड्डी १०० रूपयांना मिळत आहे. तसेच फळांच्या दरातही वाढ झाली आहे. डाळींबाची आवक घटली असून, दरही वाढले आहेत. एक महिन्याआधी ७० ते ७५ रूपये किलो असलेल्या डाळींबाचे दर २०० रूपये किलो झाले आहेत. केळी ४० ते ५० रूपयांना एक डझन, सेफ १२० रूपये किलो, चिकूचे दर १२० रूपये किलो झाले आहेत. चिकुच्या दरातही ३० ते ४० रूपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाइचा ग्राहकांना फटका बसत आहे.

खामगाव शहरात ग्राहकांची गर्दी हरतालिका व गणेश उत्सवासाठी खरेदी करण्याकरिता खामगाव शहरातील अग्रसेन चाैक, मुख्य बाजार लाइन, फरशी परिसर, जलंब नाका परिसरात ग्राहकांची गर्दी झाली होती. पोलिस स्टेशनपासून तर फरशी परिसरपर्यंत हरतालिकासाठी लागणार्या विविध वनस्पतींची विक्री करणारी दुकाने लागली होती. ग्रामीण भागातील महिलांनी केळीची पाने, सिताफळसह विविध वनस्पती विक्रीसाठी आणल्या होत्या. सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी ४ वाजेपर्यंत शहरात ठिकठिकाणी दुकाने लागली होती. सण उत्सवामुळे फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.   

शेतकरी व ग्राहकांना फटका  पावसामुळे फूल उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. फुले झाडालाच काळी पडली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्च करून शेतकर्यांना आवक घटडली असल्याने भाववाढ झाली आहे. भाव वाढल्याने ग्राहकांनाही फटका बसत आहे.   पावसाने फुलांचे नुकसान झाले आहे. फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचा फायदा शेतकर्यांना कमी तर व्यापार्यांनाच जास्त होत आहे. ग्राहकांनाही त्याचा फटका बसत आहे.  - पदमाकर खुमकरफुल उत्पादक शेतकरी, जलंब

टॅग्स :buldhanaबुलडाणाfruitsफळे