शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस थांबला, शेतकऱ्यांचा संघर्ष कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:25 IST

अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.

- ब्रम्हानंद जाधव   लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात अति पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरले आहे. शेत आणि शेतरस्ते जलमय झालेले आहेत. पावसाच्या ताडाख्यातून उरला-सुरला शेतमाल घरी आणणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.जिल्ह्यात पावसाने ९० टक्क्यापेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतकºयांच्या डोळ्यासमोरून शेतातून वाहून गेल्या. जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसानझाले आहे़ मका, कापूस, ज्वारी आणि सोयाबीनचे हाताशी आलेले उत्पादन शेतकºयांना गमवावे लागले आहे़ सध्या पावसाने उघडीप दिली आहे. मात्र शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकºयांना पाय ठेवायला जागा सुद्धा राहिली नाही. शेतातील दलदल पाहून शेतात पावसापासून वाचलेला काही माल घरी आणणे अवघड होऊन बसले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतातच उभ्या आहेत. सोयाबीनच्या सुड्या काढण्यासाठी एकही मळणीयंत्र शेतात पोहचू शकत नाही. काही सोयाबीनच्या सुड्या तर जाग्यावरच काळवंडल्या आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनच्या सुड्या काढाव्या की, नाही हाच मोठा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

शेतमाल घरापर्यंत पोहोचणार का?अनेकांच्या शेतात आजही सोयाबीनच्या सुड्या लागलेल्या आहेत. तो शेतमाल घरापर्यंत पोहचेल की नाही याची शाश्वती राहिली नाही. शेत आणि शेतरस्ते जलमय झाल्याने शेतात ट्रॅक्टर किंवा मळणीयंत्रण जाऊ शकत नाही. गेल्यास ते ट्रॅक्टर फसण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत.एकाच ठिकाणी बसून तलाठी जुळवताहेत शेतकºयांच्या याद्यापावसाने झालेल्या नुकसानानंतर शेतकºयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून मोठी तत्परता दाखवण्यात आली. त्यासाठी सर्वेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. परंतू अनेक तलाठी एकाच ठिकाणी बसून शेतकरी आणि त्यांचा पेरा याची यादी तयार करताना आढळून आले. मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठ्यांनी शेतात न जाताच गावात बसूनच याद्यांची जुळवाजुळव केल्याचे दिसून आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती