शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पाऊस थांबला, शेतकऱ्यांचा संघर्ष कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:25 IST

अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.

- ब्रम्हानंद जाधव   लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात अति पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरले आहे. शेत आणि शेतरस्ते जलमय झालेले आहेत. पावसाच्या ताडाख्यातून उरला-सुरला शेतमाल घरी आणणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.जिल्ह्यात पावसाने ९० टक्क्यापेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतकºयांच्या डोळ्यासमोरून शेतातून वाहून गेल्या. जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसानझाले आहे़ मका, कापूस, ज्वारी आणि सोयाबीनचे हाताशी आलेले उत्पादन शेतकºयांना गमवावे लागले आहे़ सध्या पावसाने उघडीप दिली आहे. मात्र शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकºयांना पाय ठेवायला जागा सुद्धा राहिली नाही. शेतातील दलदल पाहून शेतात पावसापासून वाचलेला काही माल घरी आणणे अवघड होऊन बसले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतातच उभ्या आहेत. सोयाबीनच्या सुड्या काढण्यासाठी एकही मळणीयंत्र शेतात पोहचू शकत नाही. काही सोयाबीनच्या सुड्या तर जाग्यावरच काळवंडल्या आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनच्या सुड्या काढाव्या की, नाही हाच मोठा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

शेतमाल घरापर्यंत पोहोचणार का?अनेकांच्या शेतात आजही सोयाबीनच्या सुड्या लागलेल्या आहेत. तो शेतमाल घरापर्यंत पोहचेल की नाही याची शाश्वती राहिली नाही. शेत आणि शेतरस्ते जलमय झाल्याने शेतात ट्रॅक्टर किंवा मळणीयंत्रण जाऊ शकत नाही. गेल्यास ते ट्रॅक्टर फसण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत.एकाच ठिकाणी बसून तलाठी जुळवताहेत शेतकºयांच्या याद्यापावसाने झालेल्या नुकसानानंतर शेतकºयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून मोठी तत्परता दाखवण्यात आली. त्यासाठी सर्वेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. परंतू अनेक तलाठी एकाच ठिकाणी बसून शेतकरी आणि त्यांचा पेरा याची यादी तयार करताना आढळून आले. मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठ्यांनी शेतात न जाताच गावात बसूनच याद्यांची जुळवाजुळव केल्याचे दिसून आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती