शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

२२ हजार हेक्टरवर बहरली रब्बीची पिके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:36 IST

तालुक्यात २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.

-  देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत पावसाळ्यात झालेला प्रचंड पाऊस बघता, चालु रब्बी हंगामात खामगाव तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्रापैकी सुमारे २५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पिके बहरली आहेत. सध्या पिकांची असलेली स्थिती पाहता, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. तालुक्यात २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.खामगाव तालुक्यात साधारणपणे गत चार ते पाच वर्षांपासून रब्बीचे क्षेत्र सतत कमी झाले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सातत्याने सामना करावा लागला. विशेष म्हणजे गतवर्षी रब्बीचा पेरा नसल्यासारखाच होता. परंतु गत पावसाळ्यात जिल्ह्यात सगळीकडेच प्रचंड पाऊस पडला. पावसाचे प्रमाण अति असल्याने शेतकºयांचा खरीप हंगाम पुर्णत: हातून गेला. एकही पिक समाधानकारक आले नाही. सगळीकडे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु हीच अतिवृष्टी रब्बी हंगामासाठी लाभदायक ठरत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळेच खामगाव तालुक्यात गत पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी रब्बीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला झाल्याचे दिसून येत आहे. कोणतेही नैसर्गिक संकट आले नाही, तर यावर्षी गहू, हरभरा उत्पादनात वाढ होईल, अशी आशा शेतकºयांना आहे. एकूण २२४०० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असली तरी कांद्याची लागवड सुरूच असल्याने या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.अशी झाली पेरणीखामगाव तालुक्यात एकूण पेरणी योग्य क्षेत्र ७९ हजार हेक्टर आहे. यातील ११ हजार ९०० हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ७ हजार हेक्टरवर हरभरा, १ हजार हेक्टरवर मका बहरला तर २ हजार ५०० हेक्टरवर कांदा पिकाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी