शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

खरिपाच्या पीक कर्जासाठी दाखवली जाते रब्बीची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:01 IST

खरीपाचे पीक कर्ज बंद होत असल्याचे सांगूण अनेक बँका शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेण्यास नकार देत आहेत.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कर्जमाफीत नाव न आल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस खरीप पीक कर्जासाठी ताटकळत ठेवण्यात आले; परंतू आता नाव आल्यानंतरही शेतकरीपीक कर्जापासून वंचीत आहेत. खरीपाचे पीक कर्ज बंद होत असल्याचे सांगूण अनेक बँका शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेण्यास नकार देत आहेत. खरीप पीक कर्जासाठी आलेल्या शेतकºयांना आता बँकांकडून रब्बीची वाट दाखवली जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात खरीप पीक कर्जावरून सुरूवातीला मोठे रणकंदन झाले. लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर पीक कर्जाचे मेळावे घेऊन पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. दरवर्षी पेक्षा यंदा पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढणार असल्याचा दावा, प्रशासनाकडून करण्यात आला. त्यासाठी बँक व्यवस्थापकांची वांरवार बैठकी झाली. पीक कर्ज नाकारणाºया किंवा मुदतीमध्ये पीक कर्जाची प्रक्रिया पूर्ण न करणाºया बँक व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत विषय गेला होता. पालकमंत्र्यांनी प्रत्येक शेतकºयांना पीक कर्ज मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतू हे सर्व प्रयत्न पालथ्या घड्यावर पाणीच ठरले. खरीप हंगाम संपत आला तरी अद्यापही उद्दिष्टांच्या ५० टक्के शेतकºयांना पीक कर्जच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. पीक कर्जासाठी बँकांनी शेतकºयांना वेठीस धरल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत. शासनाच्या कर्जमाफीत शेतकरी बसले, परंतू त्यांची नावे यादीत आली नसल्याने त्यांना बँकानी पीक कर्ज दिले नाही. जेंव्हा कर्जमाफीमध्ये नाव आले, तेंव्हा आधार प्रमाणीकरणासह अनेक कागदपत्रांसाठी शेतकºयांना पीक कर्जापासून ताटकळत ठेवण्यात आले. आता अनेक शेतकºयांच्या फाईल बँकाकंडे पडून आहेत. त्यांना खरीपा ऐवजी रब्बीचे पीक कर्ज घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तर काही बँकाकडून नवीन फाईल स्विकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार अनेक बँकामध्ये समोर आला आहे. तुमचे काम सप्टेंबरमध्ये होईल असे सांगून आतापर्यंत पीक कर्जासाठी प्रतीक्षेत ठेवलेल्या शेतकºयांना आता रब्बीचे पीक कर्ज घ्यावे, लागेल असे म्हणून परत पाठविले जात असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.पीक कर्ज वाटपाची अंतीम मुदत ही ३० सप्टेंबर आहेत. जिल्ह्यात ८४ टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झालेले आहे. आता उर्वरीत शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.-नरेश हेडाऊजिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बुलडाणा.पीक कर्ज वाटपाची मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे आता पीक कर्जासाठी आलेल्या शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज देण्यात येईल.-संयोग सिंग, बँक आॅफ महाराष्ट्र, घाटबोरी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी