शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

 जलकुंभ बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:23 IST

बेलाड व दसरखेड येथील जलकुंभ कोसळल्याची घटना घडल्याने जलकुंभाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: ग्रामिण भागातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र जलकुंभाची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र जलकुंभाच्या गुणवत्तेकडे कथितस्तरावरील अर्थकारणातून दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड आहे. गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील एकट्या मलकापूर तालुक्यात बेलाड व दसरखेड येथील जलकुंभ कोसळल्याची घटना घडल्याने जलकुंभाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केंद्र सरकारने राज्य सरकारे आणि पंचायत राजसंस्था यांच्या भागीदारीत ग्रामीण पायाभूत सुविधा विकासासाठी २००५ मध्ये १ लाख ७६ हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी भारत निर्माण&योजना पाच वर्षांसाठी लागू केली होती.त्याअंतर्गत २००५ ते २००९ या काळात ग्रामिण भागात रस्ते, टेलिफोन सेवा, जलसिंचन, पेयजल पुरवठा, घरे, विद्यूतीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेयजल पुरवठा कार्यक्रमाअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या ५५ हजार ६७ वस्त्यांना पेयजल सुविधा उपलब्ध करून देणे, पूर्वी सोय असलेल्या पण कालांतराने सोय नष्ट झालेल्या ३ लाख ३१ हजार वस्त्यांना पेयजलची सोय करून देणे आणि पाण्याचा दर्जा घसरलेल्या २ लाख १७ हजार वस्त्यांना शुद्ध पेय जल उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातही याच काळात २१ ठिकाणी जलकुंभ तयार करण्यात आले. या जलकुंभाची निर्मिती करण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती नेमण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागासह गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. याच उपक्रमाअंतर्गत बेलाड व दसरखेड येथेही जलकुंभ उभारण्यात आले होते. २१ जलकुंभापैकी मलकापूर तालुक्यातील दोन ठिकाणचे जलकुंभ चार वर्षाच्या आत कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे बांधकाम सुरु असताना समितीने नेमकी कोणती देखरेख केली याबाबतही ग्रामस्थ कुचबूच करीत आहेत. शिवाय शिवसेनेने बांधकामात भ्रष्टाचार करणाºयाविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी आता कोणावर कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

जलकुंभाच्या आॅडीटवर प्रश्नचिन्ह!जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागाकडे जिल्ह्यातील सर्व जलकुंभाची देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी आहे. दरम्यानच्या काळात दरवर्षी जलकुंभाचे आॅडीटही होते. शिवाय जलकुंभ ग्रामपंचायतकडे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर हस्तांतरीत केला जातो. तेव्हा सुस्थितीत जलकुंभ आहे असा शेराही ग्रामिण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देतात. मग मलकापूर तालुक्यातील जलकुंभ ताब्यात घेतांना शहानिशा केली नाही काय? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.सुबोध सावजींच्या तक्रारीकडे दुर्लक्षमाजी मंत्री सुबोध सावजी यांनी जिल्हयातील विविध ठिकाणच्या पाणी पुरवठा योजनांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आंदोलनही केले होते. मात्र त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही हे विशेष. यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही जलकुंभाच्या बांधकामात हात ओले झाल्याची चर्चा सुरु आहे. माजी मंत्र्यांच्या आंदोलनाची दखल जर प्रशासनाकडून घेतली जात नसेल तर ही गंभीर बाब असल्याचा आरोपही दसरखेड येथील नागरिकांनी केला आहे.

बुलडाणा जिल्हयात काही वर्षापूर्वी भारत निर्माण योजनेअंतर्गत ग्रामिण भागात जलकुंभ तयार करण्यात आले होते. स्थानिक समितीकडे देखरेखची जबाबदारी होती. समितीने नेमके काय केले हे सांगता येणार नाही. पण दसरखेड येथील घटना गंभीर आहे. आम्ही चौकशी सुरु केली आहे. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विलासराव चव्हाण चौकशी करीत आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित कारवाई करू.- प्रशांत घोडे, कार्यकारी अभियंता,ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जि.प.बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMalkapurमलकापूर