शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाला हवी गती!

By admin | Updated: November 24, 2014 00:28 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प रखडलेला, बुडीत क्षेत्रातील गावक-यांसमोर समस्यांचा डोंगर.

मानेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी जीवनदायी ठरलेल्या महत्त्वाकांक्षी अशा पूर्णा नदीवर होऊ घा तलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या २0 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन कामाला गती देण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल व पिण्याच्या पाण्याचीही समस्या मिटेल; मात्र या प्रकल्पाचे भिजत घोंगडे पडले आहे. सुमारे ३५0 कोटींचा हा प्रकल्प आज ४५00 कोटींच्या वर गेला आहे; मात्र शासनस्तरावर कामाची गती पहिल्यास अजूनही कित्येक वर्ष या प्रकल्पाला लागतील, असे दिसत आहे. जिगाव प्रकल्पांतर्गत एकंदर ४७ गावे बाधित क्षेत्रात येतात. यातील ३२ पूर्णत: तर १५ अंशत: बाधित होणार आहेत. अर्थात या ४७ गावांवर हे जिगाव धरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून होत असलेल्या वाताहतीमधून जणूकाही मरणच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बुडीत गावांना सद्य:स्थितीत गावे, घरे सोडून दुसर्‍या गावात, गावठाणात राहावयास जावे लागणार आहे. अनेक वेळा आंदोलने होऊनही शासन दरबारी विभक्त रेशनकार्डांंचा प्रश्नही मोठय़ा प्रमाणात प्रलंबित आहे. अशा एक ना अनेक समस्या आजही बुडीत क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत आहेत. वास्तविक सिंचनाचा फार मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी जिगाव प्रकल्प हा महत्त्वपूर्ण असा प्रकल्प मानला जातो आणि भविष्यात तो होईल हे नक्की! पण आजतागायत गेल्या कित्येक वर्षांपासून बुडीत क्षेत्रात गावकरी व शेतकरी यांच्यासाठी पुनर्वसनाला गती नसल्याने हा प्रकल्प डोकेदुखी होऊन बसला आहे. प्रकल्पबाधित गावांमधील ग्रामसभेद्वारा निवडलेल्या अनेक गावठाणांचा प्रश्न अधांतरीच आहे. शासनस्तरावर याबाबत आजही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोपही अनेक गावांकडून होत आहे.