शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाला हवी गती!

By admin | Updated: November 24, 2014 00:28 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प रखडलेला, बुडीत क्षेत्रातील गावक-यांसमोर समस्यांचा डोंगर.

मानेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी जीवनदायी ठरलेल्या महत्त्वाकांक्षी अशा पूर्णा नदीवर होऊ घा तलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या २0 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन कामाला गती देण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल व पिण्याच्या पाण्याचीही समस्या मिटेल; मात्र या प्रकल्पाचे भिजत घोंगडे पडले आहे. सुमारे ३५0 कोटींचा हा प्रकल्प आज ४५00 कोटींच्या वर गेला आहे; मात्र शासनस्तरावर कामाची गती पहिल्यास अजूनही कित्येक वर्ष या प्रकल्पाला लागतील, असे दिसत आहे. जिगाव प्रकल्पांतर्गत एकंदर ४७ गावे बाधित क्षेत्रात येतात. यातील ३२ पूर्णत: तर १५ अंशत: बाधित होणार आहेत. अर्थात या ४७ गावांवर हे जिगाव धरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून होत असलेल्या वाताहतीमधून जणूकाही मरणच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बुडीत गावांना सद्य:स्थितीत गावे, घरे सोडून दुसर्‍या गावात, गावठाणात राहावयास जावे लागणार आहे. अनेक वेळा आंदोलने होऊनही शासन दरबारी विभक्त रेशनकार्डांंचा प्रश्नही मोठय़ा प्रमाणात प्रलंबित आहे. अशा एक ना अनेक समस्या आजही बुडीत क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत आहेत. वास्तविक सिंचनाचा फार मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी जिगाव प्रकल्प हा महत्त्वपूर्ण असा प्रकल्प मानला जातो आणि भविष्यात तो होईल हे नक्की! पण आजतागायत गेल्या कित्येक वर्षांपासून बुडीत क्षेत्रात गावकरी व शेतकरी यांच्यासाठी पुनर्वसनाला गती नसल्याने हा प्रकल्प डोकेदुखी होऊन बसला आहे. प्रकल्पबाधित गावांमधील ग्रामसभेद्वारा निवडलेल्या अनेक गावठाणांचा प्रश्न अधांतरीच आहे. शासनस्तरावर याबाबत आजही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोपही अनेक गावांकडून होत आहे.