शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या ज्ञानगंगा धरणात उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:24 IST

farmers jumped into lower dnyanganga the dam शेतकऱ्यांनी शुक्रवारी ज्ञानगंगा धरणामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने  त्रस्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी ज्ञानगंगा धरणामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल होत असतानाच शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतीमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प-२ बृहत लघुपाटबंधारे योजनेंतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे गेल्या २६ जानेवारीपासून शेतकऱ्यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषण सुरू केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी शुक्रवारी रोजी जलसमाधी घेत असल्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी पहाटे ५ वाजता पोलिसांनी अवथळे यांना ताब्यात घेऊन खामगाव पोलिस स्टेशनला आणले.  यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत धरणांमध्ये उड्या घेतल्या. शेतकऱ्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवथळे यांना पोलिसांनी पुन्हा उपोषण स्थळी नेले. यावेळी अनंता वाघमारे, परमेश्वर निमकर्डे  या शेतकऱ्यांनी धरणात उड्या घेतल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संत, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शीतल रसाळ यांनी प्रकल्पस्थळी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोबदल्याच्या प्रश्नावर तोडगा काढणे शक्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत, मोबदला मिळत नाही, संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठे‌वण्याचे सांगितले. 

पाच जणांना रुग्णालयात हलवलेउपोषणकर्त्यांपैकी सुरेंद्र राठोड, प्रकाश धोटे,अनंता वाघमारे, रमेश मुंडे, श्रीराम मुंडे या ५ शेतकऱ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आंदोलनाला १२ दिवस उलटले आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी