शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

राज्यात तिळाचे उत्पादन निम्यावर; मकर संक्रातीला तिळाचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:05 IST

बुलडाणा : मकर संक्रात आली की तिळाची उलाढाल वाढते; मात्र राज्यातील तिळ पिकाचे क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा निम्याने घटल्याचे दिसून येत आहे. राज्यात खरीप हंगामात तिळ पिकाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार २०२ हेक्टर असून प्रत्यक्ष १७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आलेआहे. ५५ टक्के क्षेत्रावरील तिळ कमी झाल्याने या मकर संक्रातीला तिळाची चणचण जाणवत आहे.

ठळक मुद्दे३८ हजारापैकी १७ हजार हेक्टर क्षेत्रावर तिळाचे उत्पादन

ब्रम्हानंद जाधव/बुलडाणा :मकर  संक्रात आली की तिळाची उलाढाल वाढते; मात्र राज्यातील तिळ पिकाचे क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा निम्याने घटल्याचे दिसून येत आहे. राज्यात खरीप हंगामात तिळ पिकाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार २०२ हेक्टर असून प्रत्यक्ष १७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले आहे. ५५ टक्के क्षेत्रावरील तिळ कमी झाल्याने या मकर संक्रातीला तिळाची चणचण जाणवत आहे.मकर संक्रातीला ‘तिळ गुळ’ बनविण्यासाठी तिळाचे महत्व जास्त असते. मकर संक्रातीलाच तिळाचा सण म्हणून ओळखले जाते. तिळाचे महत्व असलेल्या मकर संक्रातीच्या १५ दिवस अगोदरपासूनच  राज्यभर तिळाच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू होते. खरीप हंगामात उत्पादन घेतलेला तिळ मकर संक्रातीच्या मुहूर्तावर वापरल्या जातो. महाराष्ट्रात तिळाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार २०२ हेक्टर आहे. गेल्या चार वर्षापूर्वी संपूर्ण क्षेत्रावर तिळाची पेरणी करून १०० टक्के उत्पादन घेतले जात होते. मात्र, आता राज्यात तिळाचे क्षेत्र निम्याने घटल्याचे चित्र दिसून येत आहे. ३८ हजार २०२ हेक्टर क्षेत्रापैकी २०१७ मध्ये केवळ १७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले आहे. तर २०१६ मध्ये सुद्धा तिळाचे क्षेत्र कमीच म्हणजे २१ हजार १९४ हेक्टर क्षेत्रावरच राहिले. राज्यात खरीप हंगामातील तिळाचे क्षेत्र ५५ टक्क्याने घसरल्याने मकर संक्रातीसारख्या सणाच्या मुहूर्तावर तिळाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तिळाचे भावही वाढले आहेत.पश्चिम विदर्भात २ हजार ६७३ हेक्टरवर  तिळपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात तिळाचे उत्पादन कमी झाले आहे. अमरावती विभागात एकूण ४ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र तिळ पिकाखाली असून त्यापैकी केवळ २ हजार ६७३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ३५० हेक्टर, अकोला जिल्ह्यात ५५, वाशिम जिल्ह्यात ५२, अमरावती जिल्ह्यात १२ आणि यवतमाळ जिल्ह्यात ६७ हेक्टरवर खरीप हंगामात तिळ उत्पादन घेण्यात आले आहे.भावातही तफावततिळाच्या भावातही सध्या बाजार समित्यानुसार तफावत दिसून येते. बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खामगाव येथे तिळाला ५ हजार ३०० ते ८ हजार ५०० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळत आहे. तर नांदुरा येथील बाजार समितीमध्ये ६ हजार ते ७ हजार २०० रुपये व शेगाव येथे ६ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपये प्रति क्वीविंटल भाव आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ५ हजार ५०० ते ८ हजार २५० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रagricultureशेती