शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोरोना’चा प्रसार थांबविणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य - डॉ. निलेश टापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:32 IST

खामगाव उपजिल्हा सामान्य  रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. निलेश टापरे यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभर हाहाकार माजविला आहे. कोरोना हा विषाणू प्रामुख्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीशी ती खोकताना किंवा शिंकताना संपर्क आल्यास पसरतो. त्यामुळे संपर्क टाळणे  आणि कोरोनाचा प्रसार थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. खामगाव उपजिल्हा सामान्य  रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. निलेश टापरे यांच्याशी साधलेला संवाद...

कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजना काय?कोरोना हा आजार प्रामुख्याने संपर्कातून तसेच विषाणू असलेल्या वस्तूला स्पर्श करून त्यानंतर तिच्या डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करतो त्यावेळी हा आजार पसरतो. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी संपर्क टाळणे जितके गरजेचे आहे, तितकेच वारंवार हात धुणे गरजेचे आहे. खोकताना आणि शिंकताना  टिशूने नाक झाकून घ्यावे. हात स्वच्छ नसल्यास नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करू नये. तसेच आजारी असलेल्या रूग्णांशी नजीकचा संपर्क टाळा.

कोरोनाच्या अनुषंगाने उपजिल्हा रूग्णालयात उपलब्ध सुविधा काय ?कोरोना या विषाणूचे संशयीत रूग्ण खामगाव आणि परिसरात आढळून आल्यानंतर कोरोना संसर्गाच्या रूग्णासाठी आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आला. सुरूवातीला या कक्षात १० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, संभाव्य परिस्थिती आणि धोका लक्षात घेता   आयसोलेशन कक्षात आणखी ४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने  रूग्णालयात विशेष पथक कार्यरत आहे का?अजिबात नाही, रूग्णालयात कार्यरत असलेला स्टापच आयसोलेशन कक्षात दाखल  रूग्णांची काळजी घेत आहे. योग्य तो औषधोपचार त्यांच्यावर करण्यात येत आहे. सोबतच संशयीत रूग्णांची वेळीच नोंद घेत, कम्युनिटी स्प्रेडचा धोका टाळण्यासाठी रूग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. रूग्णालयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी समाधान व्यक्त केले आहे.‘

कोरोना म्हणजेच कोविड-१९ हा नवीन विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा फ्यू सारखा संसर्गजन्य आजार असून, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. सुरूवातीला काही दिवस ही लक्षणे दिसून येत नाहीत.

खामगाव येथून किती रूग्णांचे अहवाल पाठविले?कोरोना या विषाणूचे संक्रमन वाढीस लागल्यानंतर खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातून १६ जणांचे स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी आतापर्यंत १५ जणांचे अहवाल प्राप्त झालेत. आनंदाची बाब म्हणजे या सर्वच १५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एक अहवाल सद्यस्थितीत प्रलंबित आहे. शुक्रवारी एका वयोवृध्द महिलेचा आयसोलेशन कक्षात मृत्यू झाला. खबरदारी म्हणूनही या महिलेचाही स्वाब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. उपजिल्हा सामान्य रूग्णालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसinterviewमुलाखत