शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

रासायनिक खतांचे भाव वाढले; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:03 IST

खामगाव: बुलडाणा जिल्हयात सध्या तीव्र दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगामाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

- विक्रम अग्रवालखामगाव: बुलडाणा जिल्हयात सध्या तीव्र दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगामाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.्रगतवर्षी समाधानकारक पीक न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यात पीककर्जासाठी अर्ज करूनही अनेक शेतकºयांचे कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर खरिपातील पिकांची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन खर्चही वाढणार आहे. ही बाब ऐन दुष्काळात शेतकºयांची चिंता वाढवणारी ठरणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्वी शेतीच्या मशागतीची कामे आटोपून घेतात. त्यानंतर मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असते. साधारण २२ मे नंतर शेतकरी खते व बियाण्यांची खरेदी करतात. उत्पादन चांगले मिळावे यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सध्या कृषी सेवा संचालकांनी खतांचा व बियाणांचा साठा करून ठेवणे सुरू केले आहे. त्यातच खत कंपन्यांनी दरवाढ केली आहे खत उत्पादक कंपन्यांनी खतांमध्ये ५० किलोच्या बॅग मागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेती पिकांचे उत्पादन खर्चही वाढणार आहे. त्या तुलनेत कोणत्या कोणत्या पिकाला अपेक्षित भाव मिळेल याचीही चिंता शेतकºयांना लागली आहे.

 

   खते (५० किलो)    पूर्वीचे दर    नवीन दर          भाववाढ                 डिएपी        १२५०     १४४०                     १९०      १०:२६:२६          ११३५     १४५०                      ३१५      २०:२०:१३           ९१०    ११००                        १९०      १२:३२:१६        ११५५    १४७५                         ३२०      पोटेश                ६७०    ९५०                           २८०       १८:१८:१०        ८५०    १०५०                         २००    

पिकांच्या वाढीसाठी शेतकरी नियोजन करीत असतो. यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकºयांच्या आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा खरेदी-विक्रीला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.- शिवदास गायकवाडकृषी केंद्र संचालक

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी