शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:42 IST

काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देसात नोव्हेंबर रोजी अमरावतीत येथे काँग्रेसचा जनआक्रोश  मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्याचे सरकार हे असंवेदनशील असून, शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना दिलासादायक असे काम या सरकारने  गेल्या तीन वर्षांत केलेले नाही. त्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात  आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे  यांनी येथे दिली.काँग्रेस कार्यालयात आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आ. राहुल बोंद्रे,  मेळाव्याचे समन्वयक श्याम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड,जि.प. सदस्य अँड. जयश्री शेळके,  माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, शैलेश सावजी, लक्ष्मणराव  घुमरे उपस्थित होते. कर्जमाफीची घोषणा करून पाच महिने झाले,  तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कुठलाही दिलासा नाही. अधिवेशना पर्यंत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यास आम्ही भाग पाडू,  असे ठाकरे यावेळी म्हणाले. कीटकनाशकामुळे शेतकर्‍यांचा मृ त्यू झाल्याप्रकरणी मूळ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,  यासह अन्य मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा असल्याचे ते  म्हणाले. सोबतच संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांवरही कारवाई  करण्यात यावी, अशी  मागणी असल्याचे ते म्हणाले. वर्तमानात  समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.  वादग्रस्त राणी पद्मावती चित्रपटात वास्तव चित्रण असावे, जन तेच्या भावनांचा विचार करता वादग्रस्त सीन काढून टाकावे,  असेही ते म्हणाले. 

अधिवेशनावर काँग्रेसची दिंडी अधिवेशनादरम्यान काँग्रेस मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मार्गे  अधिवेशनावर दिंडी काढणार आहे. २६ किंवा २७  नोव्हेंबरदरम्यान या दिंडीस प्रारंभ होणार असल्याचे संकेत  माणिकराव ठाकरे यांनी दिले. याची अद्याप अधिकृत घोषणा  झाली नसली, तरी प्रदेश काँग्रेसतर्फे ती लवकरच करण्यात येणार  असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस