शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:42 IST

काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देसात नोव्हेंबर रोजी अमरावतीत येथे काँग्रेसचा जनआक्रोश  मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्याचे सरकार हे असंवेदनशील असून, शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना दिलासादायक असे काम या सरकारने  गेल्या तीन वर्षांत केलेले नाही. त्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात  आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे  यांनी येथे दिली.काँग्रेस कार्यालयात आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आ. राहुल बोंद्रे,  मेळाव्याचे समन्वयक श्याम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड,जि.प. सदस्य अँड. जयश्री शेळके,  माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, शैलेश सावजी, लक्ष्मणराव  घुमरे उपस्थित होते. कर्जमाफीची घोषणा करून पाच महिने झाले,  तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कुठलाही दिलासा नाही. अधिवेशना पर्यंत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यास आम्ही भाग पाडू,  असे ठाकरे यावेळी म्हणाले. कीटकनाशकामुळे शेतकर्‍यांचा मृ त्यू झाल्याप्रकरणी मूळ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,  यासह अन्य मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा असल्याचे ते  म्हणाले. सोबतच संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांवरही कारवाई  करण्यात यावी, अशी  मागणी असल्याचे ते म्हणाले. वर्तमानात  समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.  वादग्रस्त राणी पद्मावती चित्रपटात वास्तव चित्रण असावे, जन तेच्या भावनांचा विचार करता वादग्रस्त सीन काढून टाकावे,  असेही ते म्हणाले. 

अधिवेशनावर काँग्रेसची दिंडी अधिवेशनादरम्यान काँग्रेस मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मार्गे  अधिवेशनावर दिंडी काढणार आहे. २६ किंवा २७  नोव्हेंबरदरम्यान या दिंडीस प्रारंभ होणार असल्याचे संकेत  माणिकराव ठाकरे यांनी दिले. याची अद्याप अधिकृत घोषणा  झाली नसली, तरी प्रदेश काँग्रेसतर्फे ती लवकरच करण्यात येणार  असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस