शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वीज तुटीचा फटका शेतकऱ्यांना !

By admin | Updated: May 14, 2017 04:04 IST

सिंचनासाठी शेतकरी रात्री शेतात

बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा फटका मात्र शेतकर्यांना बसत आहे. महावितरणने कृषी पंपांना देण्यात येणार्या विजेत कपात केली असून, दिवसा वीज पुरवठा बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात येत आहे. दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठय़ात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, भारनियमन करीत असताना नागरी वस्तीला जास्तीत जास्त वीज देण्याचे धोरण अवलंबविण्यात आले असून, कृषी पंपांना वीज देण्याला दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये संत्रा, पपई, मोसंबी, डाळिंब, केळी ही फळपिके आहेत. तसेच उन्हाळी पीकही शेतकरी मोठय़ा प्रमाणात घेत आहेत. वर्हाडात मोठय़ा प्रमाणात संत्र्याचे पीक घेतले जाते. उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. या झाडांना पाणी मिळाले नाही, तर वर्षानुवर्षांपासून वाढविलेली झाडे सुकतात व शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. महावितरणच्यावतीने मात्र कृषी पंपांना वीज देण्याला दुय्यम स्थान देण्यात आले असून, भारनियमनात वाढ करण्यात आली आहे. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषी पंपांना कमी प्रमाणात वीज देण्यात येत असून, दिवसभर वीज पुरवठा बंद असतो, तर रात्रीच्या वेळी वीज देण्यात येते. वीज स्थिती बदलताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.महावितरणला महानिर्मितीसह विविध स्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे चार हजार मेगावॉटपर्यंत विजेची उपलब्धता कमी असतानाही महावितरणने १५00 मेगावॉटपर्यंत आवश्यकतेनुसार भारनियमन केले आहे.राज्यातील काही संच तांत्रिक कारणांमुळे बंद असून, सदर संच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासोबतच इतर स्रोतांमधूनही विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.