शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:35 IST

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील उमेदवार इतर जिल्ह्यांसाठी अर्ज करत आहेत. वनरक्षक पदासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची ३ फेब्रुवारी ही अंतीम मुदत असल्याने अर्जासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी उरला आहे. वने हे नैसर्गिक स्त्रोतांचा एक अविभाज्य भाग सजमला जातो. या नैसर्गिक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी ‘वनरक्षकाच्या’ खांद्यावर असते. त्यामुळे वन विभागात वनरक्षक (गट क) या पदाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. राज्यात वन विभागातील गट क संवर्गातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदे भरण्यात येत असून त्यामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ व अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागांचा समावेश आहे. परंतू या पदभरतीमध्ये पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला या तिन्ही जिल्ह्याच्या वाट्याला एकही जागा आली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात भरतीप्रक्रिया सुरू असताना पश्चिम वºहाडातील जिल्हे यामध्ये वगळण्यात आल्याने या जिल्ह्यातील उमेदवारांना इतर ठिकाणी अर्ज करावे लागत आहेत. परिणामी बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेसाठी सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणार असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची सुरूवात १४ जानेवारी पासून सुरू झालेली आहे. त्याकरीता उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठल्याही एका विषयात उत्तीर्ण असावा, अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जमाती किंवा माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण व उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे, अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची अंतीम मुदत ३ फेब्रुवारी असून अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी उरल्याने विद्यार्थ्यांची सध्या आॅनलाइन संकेतस्थळावर गर्दी होत आहे.

राज्यात उपलब्ध जागा

राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदाच्या जागा आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग २२, सोलापूर दोन, ठाणे १९५, यवतमाळ ६२, पालघर २९, पभरणी तीन, पुणे ३२, रत्नागिरी दोन, सांगली दोन, सांतारा १३, कोल्हापूर ७२, नागपूर २६८, नांदेड ३७, नंदुरबार ७०, नाशिक ५८, उस्मानाबाद १०, चंद्रपूर ८०, धुळे १४६, गडचिरोली १४१, गोंदिया ६८, हिंगोली दोन, जळगाव ३२, अहमदनगर ३०, अमरावती ८०, औरंगाबाद ९५, बीड तीन, भंडारा १९ जागा आहेत.

सर्कल निहाय ह्या जागा आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील एकूण रिक्त पदे विचारात घेऊन ही भरती होत असून यात नविन भरती प्रक्रियेतील उमेदवारांची अकोला, बुलडाणा, वाशिम कुठेही बदली होऊ शकते.

- संजय माळी, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग