शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:35 IST

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातील उमेदवार इतर जिल्ह्यांसाठी अर्ज करत आहेत. वनरक्षक पदासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची ३ फेब्रुवारी ही अंतीम मुदत असल्याने अर्जासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी उरला आहे. वने हे नैसर्गिक स्त्रोतांचा एक अविभाज्य भाग सजमला जातो. या नैसर्गिक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी ‘वनरक्षकाच्या’ खांद्यावर असते. त्यामुळे वन विभागात वनरक्षक (गट क) या पदाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. राज्यात वन विभागातील गट क संवर्गातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदे भरण्यात येत असून त्यामध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ व अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागांचा समावेश आहे. परंतू या पदभरतीमध्ये पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला या तिन्ही जिल्ह्याच्या वाट्याला एकही जागा आली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात भरतीप्रक्रिया सुरू असताना पश्चिम वºहाडातील जिल्हे यामध्ये वगळण्यात आल्याने या जिल्ह्यातील उमेदवारांना इतर ठिकाणी अर्ज करावे लागत आहेत. परिणामी बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेसाठी सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणार असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची सुरूवात १४ जानेवारी पासून सुरू झालेली आहे. त्याकरीता उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठल्याही एका विषयात उत्तीर्ण असावा, अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जमाती किंवा माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण व उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे, अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची अंतीम मुदत ३ फेब्रुवारी असून अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी उरल्याने विद्यार्थ्यांची सध्या आॅनलाइन संकेतस्थळावर गर्दी होत आहे.

राज्यात उपलब्ध जागा

राज्यात एकूण ९०० वनरक्षक पदाच्या जागा आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग २२, सोलापूर दोन, ठाणे १९५, यवतमाळ ६२, पालघर २९, पभरणी तीन, पुणे ३२, रत्नागिरी दोन, सांगली दोन, सांतारा १३, कोल्हापूर ७२, नागपूर २६८, नांदेड ३७, नंदुरबार ७०, नाशिक ५८, उस्मानाबाद १०, चंद्रपूर ८०, धुळे १४६, गडचिरोली १४१, गोंदिया ६८, हिंगोली दोन, जळगाव ३२, अहमदनगर ३०, अमरावती ८०, औरंगाबाद ९५, बीड तीन, भंडारा १९ जागा आहेत.

सर्कल निहाय ह्या जागा आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील एकूण रिक्त पदे विचारात घेऊन ही भरती होत असून यात नविन भरती प्रक्रियेतील उमेदवारांची अकोला, बुलडाणा, वाशिम कुठेही बदली होऊ शकते.

- संजय माळी, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग