शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
7
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
8
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
9
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
10
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
11
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
12
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
13
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
14
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
15
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
16
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
17
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
18
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
19
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
20
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला

सामाजिक ऐक्य परिषदांचे सकारात्मक परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:46 IST

संवेदनशील शहर आणि ग्रामीण भागातही या परिषदांमुळे सामाजिक सलोखा राखल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: समाजात एकोपा आणि शांतता प्रस्थापित करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या सामाजिक ऐक्य परिषदांचे बुलडाणा जिल्ह्यात सकारात्मक परिणाम येत असल्याचे चित्र  आहे. विविध धार्मिक सण, उत्सव आणि इतर सामाजिक सणांच्यावेळी आयोजित सामाजिक ऐक्य परिषदांमुळे समाजातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मदत होत असल्याचे दिसून येते. संवेदनशील शहर आणि ग्रामीण भागातही या परिषदांमुळे सामाजिक सलोखा राखल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. पोलिस प्रशासनाकडून समाजात वेळप्रसंगी कायद्याचा बडगा उगारल्या जातो.  समाजातील अपप्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक असतो. मात्र, काहीप्रसंगी पोलिसांमधील मानविय दृष्टीकोन काम करून जातो.  प्रेम आणि आत्मिय भावनेमुळे अट्टल गुन्हेगार सुधारल्याची अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. व्यक्ती सोबतच समाजाच्या बाबतीतही हीच बाबू लागू पडते. त्यामुळे गत काही दिवसांमध्ये बुलडाणा जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बुलडाणा जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘सामाजिक ऐक्य परिषद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धार्मिक सण, उत्सव आणि महत्वाच्या प्रसंगी सामाजिक ऐक्य परिषद आणि शांतता समिती सभांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक सौहार्द राखण्यासाठी मदत मिळाली.

 येथे झाली ‘सामाजिक ऐक्य परिषद’!

बुलडाणा जिल्ह्यात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव, विविध धार्मिक सुणासुदीच्या काळात तसेच महत्वाच्याप्रसंगी सामजिक ऐक्य परिषद आयोजित करण्यात येतात. सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंचे एकाचवेळी प्रबोधन ठेवण्यात येते. मानवतेचा दृष्टीकोन हे धर्मगुरू समाजासमोर मांडतात. सामाजिक एकतेचे महत्व पटविणाºया सामाजिक ऐक्य परिषदा घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, वडनेर भोलजी, जळगाव जामोद, जामोद, पिंपळगाव राजा, मलकापूर, माटरगाव तर घाटावरील बुलडाणा, चिखली, मेहकर, साखरखेर्डा, देऊळगाव राजा, दुसरबीड, बोराखेडी, धाड, मेहकर येथे घेण्यात आल्या.

 शांतता समिती सभांनाही सकारात्मक यश!‘सामाजिक ऐक्य परिषद’ या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसोबतच बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखाली आणि घाटावरील विविध विभागात शांतता समितीच्या बैठका सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येतात. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात १८ शांतता समितीच्या सभा आयोजित करण्यात आल्या. या बैठकांना विविध ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 

 बुलडाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गोष्ट कायद्याने सुधारू शकत नाही. अनेक ठिकाणी मानवीय दृष्टीकोन कामी येतो. समाजात सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत.- डॉ. दिलीप पाटील भुजबळजिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocialसामाजिकkhamgaonखामगाव