शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

लोंबकळलेल्या वीज तारा ठरताहेत धोकादायक!

By admin | Updated: April 10, 2017 00:26 IST

उघडे विद्युत रोहित्र : विद्युत वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार

उद्धव फंगाळ - मेहकरसध्या मेहकर शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी उघडे असलेले रोहीत्र व घरांवर लोबंकाळलेल्या विजेच्या तारांमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देउन उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.मेहकर येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाररामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिंडीग न तपासता तसेच त्या मिटर वरून विजेचा किती वापर होेतो, याची कोणतीही शहानिशा न करता मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा विद्युत बिले देण्यात येत आहेत. यामुळे गोरगरीब ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र काही विद्युत ग्राहकांचा विजेचा वापर जास्त असतांनाही त्या विभागाचे संबंधित अधिकारी तथा लाईनमन यांचे हितसंबंध असल्याने अनेक बिले कमी जास्त प्रमाणात देण्यात येत आहेत.अशा प्रकारामुळे विद्युत वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागात सध्या भुईमुंग, कांदा, भाजीपाला, आदी पिकांसाठी पाण्याची गरज आहे. अशा पिकांना पाणी देण्यासाठी २४ तासामधून केवळ ७ ते ८ तास विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. भारनियमनाच्या नावाखाली तासन-तास विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच एखाद्या वेळेस शॉट-सर्किट व इतर कारणामुळे कृषी पंपाची वीज बंद पडल्यास दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही.संबंधित विभागाचे अधिकारी तथा लाईनमन यांचेकडे वीज जोडण्याची मागणी अथवा तक्रार केल्यास केवळ उडवा-उडवीची उत्तरे मिळते, तर जाणीपुर्वक व खोडसाळपणाने विज जोडण्यात येत नाही. शेतकऱ्यांना नाईलास्तव खासगी लाईनमनला पैसे देउन विज जोडून घ्यावी लागते. अनेक शेतामध्ये विजेचे तार लोंबकाळलेले आहेत. तर विजेचे खांब वाकलेल्या परीस्थीत आहेत. तसेच रोहित्र उघडेच असल्याने नागरीकांच्या जिवीत्वास धोका निर्माण झालेला आहे.या संदर्भात विज वितरण कंपनीकडे तक्रारी करूनही कारवाई तर होतच नाही व कामही होत नाही. केवळ कागदीघोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्ग, सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. विज वितरण कंपनी संदर्भात लोकप्रतिनिधी सुद्धा उदासीन दिसत असुन नेमका न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना पडला आहे. विज वितरण कंपनीच्या मनमानी धोरणामुळे नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्युत वितरणच्या या कामाकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.