शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

लोंबकळलेल्या वीज तारा ठरताहेत धोकादायक!

By admin | Updated: April 10, 2017 00:26 IST

उघडे विद्युत रोहित्र : विद्युत वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार

उद्धव फंगाळ - मेहकरसध्या मेहकर शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी उघडे असलेले रोहीत्र व घरांवर लोबंकाळलेल्या विजेच्या तारांमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देउन उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.मेहकर येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाररामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिंडीग न तपासता तसेच त्या मिटर वरून विजेचा किती वापर होेतो, याची कोणतीही शहानिशा न करता मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा विद्युत बिले देण्यात येत आहेत. यामुळे गोरगरीब ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र काही विद्युत ग्राहकांचा विजेचा वापर जास्त असतांनाही त्या विभागाचे संबंधित अधिकारी तथा लाईनमन यांचे हितसंबंध असल्याने अनेक बिले कमी जास्त प्रमाणात देण्यात येत आहेत.अशा प्रकारामुळे विद्युत वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागात सध्या भुईमुंग, कांदा, भाजीपाला, आदी पिकांसाठी पाण्याची गरज आहे. अशा पिकांना पाणी देण्यासाठी २४ तासामधून केवळ ७ ते ८ तास विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. भारनियमनाच्या नावाखाली तासन-तास विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच एखाद्या वेळेस शॉट-सर्किट व इतर कारणामुळे कृषी पंपाची वीज बंद पडल्यास दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही.संबंधित विभागाचे अधिकारी तथा लाईनमन यांचेकडे वीज जोडण्याची मागणी अथवा तक्रार केल्यास केवळ उडवा-उडवीची उत्तरे मिळते, तर जाणीपुर्वक व खोडसाळपणाने विज जोडण्यात येत नाही. शेतकऱ्यांना नाईलास्तव खासगी लाईनमनला पैसे देउन विज जोडून घ्यावी लागते. अनेक शेतामध्ये विजेचे तार लोंबकाळलेले आहेत. तर विजेचे खांब वाकलेल्या परीस्थीत आहेत. तसेच रोहित्र उघडेच असल्याने नागरीकांच्या जिवीत्वास धोका निर्माण झालेला आहे.या संदर्भात विज वितरण कंपनीकडे तक्रारी करूनही कारवाई तर होतच नाही व कामही होत नाही. केवळ कागदीघोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्ग, सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. विज वितरण कंपनी संदर्भात लोकप्रतिनिधी सुद्धा उदासीन दिसत असुन नेमका न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना पडला आहे. विज वितरण कंपनीच्या मनमानी धोरणामुळे नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्युत वितरणच्या या कामाकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.