शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

प्लास्टिक बंदीचे खुलेआम उल्लंघन

By admin | Updated: September 17, 2014 01:01 IST

बुलडाणा जिल्ह्यात गुरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले : मानसिकता बदलण्याची गरज

बुलडाणा - सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा शहरात राजरोस वापर सुरू आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे गुरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, जैविक प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत पालिकेतर्फे जनजागृती करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र ठोस दंडात्मक कारवाई न केल्याने प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. यामुळे कचरा व्यवस्थापनात अडचणी येतात. प्लास्टिकमधील विघटन न होणार्‍या रसायनामुळे पर्यावरणाला मुख्य धोका निर्माण झाला आहे. यामध्ये सांडपाणी निचरा करणार्‍या व्यवस्थेत अडथळे निर्माण होणे, भूगर्भजल प्रदूषित होणे असे अनेक धोके समाविष्ट आहेत. ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक यादृष्टीने जास्त धोकादायक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ११ मे २0११ च्या आदेशानुसार ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे; तसेच तंबाखू, पानमसाला, गुटखा यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास व विक्री करण्यास बंदी घातली आहे; मात्न सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी झाली नाही.परिणामी ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणासह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे नगरपालिका प्रशासन ठोस कार्यवाही करीत नसून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्नण मंडळ यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.** अशी आहे कारवाईची तरतूदप्लास्टिक निर्बंधाबाबत पर्यावरण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार तयार केलेल्या पर्यावरण संरक्षण नियम ४ नुसार ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे उत्पादन करणे, ते आयात करणे वा त्याचा पुरवठा करणे तसेच विक्री करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २000 मधील तरतुदीनुसार नगर परिषदेला ही जबाबदारी देण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाने कारवाई प्रस्तावित करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर पालिकेला दिले आहेत; परंतु पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उदासीन असल्यामुळे याकडे कोणीही लक्ष देत नाही.