शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सुतगिरणीतील गैरव्यवहाराबाबत ‘आप’ संघटनेकडून जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:55 IST

हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणीतील गैरव्यवहाराबाबत शेअरधारकासह ‘आप’ संघटनेचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन नांदुरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहितयाचिका दाखल केली आहे. 

खामगाव : हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणीतील गैरव्यवहाराबाबत शेअरधारकासह ‘आप’ संघटनेचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन नांदुरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहितयाचिका दाखल केली आहे. मलकापूर, नांदुरा, व मोताळा तालुक्याअंतर्गत येणारी हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणी ही मागील काही वर्षापासून वादाच्या भोवºयात सापडली आहे. कामगारांचे थकीत वेतन, निवृत्त कर्मचाºयांना न मिळालेला लाभ, गिरणीतील मशिनींची नियमबाह्य विक्री, हिना ट्रेडिंग कंपनीसोबत झालेला गैरव्यवहार, हायवेमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला प्रकरण, माजी संचालकांकडून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, निवडणूकीदरम्यान झालेली न्यायालयीन लढाई अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. शेतकºयांच्या हितासाठी सुरु झालेली ही सूतगिरणी आज अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. या सर्व प्रकाराची शासनामार्फत अनेकदा चौकशीही करण्यात आली. परंतू त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे या सूत गिरणीमध्ये आजपर्यंत झालेल्या गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी होवून दोषींवर कारवाई होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहितयाचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सूतगिरणीचे शेअरधारक रामराव काशिराम कळसकार (रा. तिकोडी), आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन वसंतराव नांदुरकर (रा. नांदुरा), विर जगदेवराव यांचे चरित्र लेखक मुकूंद विश्वनाथ चोपडे (रा. कोळंबा) यांनी दाखल केली आहे. यामध्ये प्रतिवादी म्हणून वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव, संचालक सहकारी संस्था व वस्त्रोद्योग नागपूर, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, सूतगिरणीचे अध्यक्ष तसेच सुनिता पांडे (विशेष लेखाकार सहकारी संस्था, सुतगिरणी) अमरावती यांचा समावेश आहे. या जनहित याचिकेवर १० सप्टेंबररोजी सुनावणी झाली. त्यात सूतगिरणीला कोणत्याही प्रकारचे अनुदान न देण्याचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले असून सर्व प्रतिवादींना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ व पवन राहूलकर यांनी बाजू मांडली. या जनहित याचिकेची सुनावणी २९ आॅक्टोबर रोजी होणार आहे. याच दिवशी माजी संचालक भोजराज शेलकर यांनी दाखल केलेल्या रिट पिटीशन नं. ११६६ वर सुद्धा सुनावणी होईल. 

न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणारसूतगिरणी बंद पडल्याने हजारो कामगारांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, शेअरधारकांना न्याय मिळवून देईपर्यंत आप संघटना स्वस्थ बसणार नाही. आमचा लढा सुरुच ठेवू. डॉ. नितीन नांदुरकर, जिल्हा संयोजक, आम आदमी पार्टी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा