शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

-तर बँकेवर फौजदारी कारवाई

By admin | Updated: May 20, 2016 01:54 IST

पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा न करण्याचा किशोर तिवारी यांचा इशारा.

बुलडाणा : पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना विम्याची नुकसानभरपाई मिळाली आहे. ही नुकसानभरपाईची रक्कम बँकांनी शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात जमा करू नये. अशाप्रकारे पीक विम्याच्या नुकसानभरपाईची मदत कर्ज खात्यात जमा केल्यास बँकेवर कारवाई करण्यात येईल, प्रसंगी एफआयआरसुद्धा दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी दिला. पीक कर्ज पुनर्गठन व वाटप आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रोते, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे. उपनिबंधक प्रशासन उमेशचंद्र हुसे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, नाबार्डचे व्यवस्थापक बोंदाडे आदी उपस्थित होते. पीक कर्ज घेताना बँका मुद्रांक शुल्क भरून घेतात, हे मुद्रांक व अन्य महसूल शुल्क शासन भरणार असल्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगत तिवारी म्हणाले, पीक कर्जासाठी बँका सर्च रिपोर्टची मागणी करतात. पीक कर्जासाठी कुठल्याही प्रकारचा सर्च रिपोर्ट लागत नाही. त्यामुळे बँकांनी सर्च रिपोर्ट घेऊ नये. कृषी कर्ज एक लाख रुपयापयर्ंत असेल, तर त्याचा सातबारावर बोझा चढविला जाणार नाही. बँकांनी तलाठय़ाच्या सही व शिक्कय़ानिशी असेलला सातबारा महत्त्वाचा दस्तऐवज मानून ऑफलाइन सातबारासुद्धा ग्राह्य धरावा. शेतकर्‍यांच्या दुर्धर आजारावरती उपचार खर्चासाठी शासन राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून मदत करणार आहे. शासन शेतकर्‍यांच्या संपूर्णपणे पाठीशी उभे आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी बँकांनी कर्ज वितरणाची टक्केवारी गाठण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करावे. महसूल प्रशासन बँकाच्या सहकार्यासाठी तयार आहे. बँकांनी शिबिरे घेऊन फ्लेक्स लावून पीक कर्ज वितरण वाढविण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला बँकांचे अधिकारी, संबंधित यंत्रणांचे प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी विकास अधिकारी व गटविकास अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नाबार्डचे व्यवस्थापक बोंदाडे यांनी सादरीकरण केले.