शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीत विद्यार्थी केवळ पटावरच

By admin | Updated: July 5, 2017 13:50 IST

अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरचशिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे.

सिंदखेडराजा: तालुक्यामध्ये शहरासह गावागावात वस्तीवाड्यावर शासनानेअंगणवाड्या सुरु केल्या. या अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरचशिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे.    संवर्ग विकास अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी महेश सुळे यांनी माळसावरगाव सह शहरातील अंगणवाड्यांना ३ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजताभेटी दिल्या. सावरगाव माळ येथील अंगणवाडीत एकही बालक आढळून आला नाही.सिंदखेडराजा तालुक्यामध्ये २०३ अंगणवाडी व ७ मीनी अंगणवाडी अशा २१०अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये ६ हजार ७६० मुले व ५ हजार ९७८ मुली अशी एकूण१२ हजार ७३८ पटसंख्या कागदोपत्री नोंद आहे. ९ जुन्या व ६८ अंगणवाड्यंनानविन इमारती आहेत. अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आहे. ६महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना शिरा ९६० ग्रॅम, उममा ९६०ग्रॅम, सातु ९६० ग्रॅम व पॅकबंद पाकीट पंचविस दिवसासाठी तीन पाकीट घरपोचची सुविधा आहे. गरोदर स्तनदा मातांना शिरा ११२० ग्रॅम, उपमा सुकळी ११२०ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसासाठी ३ पाकीट घरपोच, ३ ते ६ वर्षलाभार्थ्यांना गरम ताजा आहार खिचडी, कडधान्य, उसळ, लापसी ९० ग्रॅम तांदूळव १० ग्रॅम दाळ, २० ग्रॅम मटकी, २० ग्रॅम वटाना उसळ दररोज केंद्रामध्येदेण्यात यावा. किशोर मुली १५ ते १८ वयोगटातील उपमा, सातु, शिरा व २५दिवसासाठी ३ पॅकबंद पाकीट घरपोच देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.  मात्र३ जुलै रोजी आमचे प्रतिनिधी व संवर्ग विकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्पअधिकारी महेश सुळे यांनी माळ सावरगाव येथील अंगणवाडीला भेट दिली असताएकही बालक उपस्थित नव्हते. बालकांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटीघेतल्या असता बालक अंगणवाडीत किती वाजता जाते किती वाजता घरी येते,बालकांना पोषण आहार काय दिल्या जातो तर तांदळाच्या खिचडी शिवाय काहीसांगता आले नाही. बालकांना पूर्वशालेय शिक्षण, गीत, गाणे, खेळ शिकविल्याजाते काय, याबद्दल पालक अनभिज्ञ असून शेतामध्ये कामे सुरु असल्यामुळेबालकांना शेतात घेऊन जावे लागते. अंगणवाड्या प्रकल्पा संदर्भात पालकसंभ्रमावस्थेत दिसले. तर सिंदखेडराजा येथील अंगणवाड्यांना सकाळी ९ ते १०वाजता भेटी दिल्या असता तीन अंगणवाड्यांना ताळे लावलेले असून त्या बंदचदिसल्या, अशीच अवस्था तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाड्यांची असूनप्रशासनातील यंत्रणेची उदासिनता दिसून आली. शासनाचा हेतु साध्यकरण्यासाठी शासन, स्थानिक शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, पदाधिकारी व पालकयांनी समन्वयाने योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी कठोर प्रयत्न व वैयक्तीकसहभाग नोंदविणे काळाची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)