शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

जिल्ह्यातील २४ टक्केच शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST

त्यातच २०१३ मध्ये जेथे जिल्ह्यातील अवघ्या ०.३४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता तेथे गेल्या वर्षी ५० टक्के शेतकऱ्यांनी ...

त्यातच २०१३ मध्ये जेथे जिल्ह्यातील अवघ्या ०.३४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता तेथे गेल्या वर्षी ५० टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला, मात्र, लाभाबाबत शाश्वती नसल्याने सध्या या योजनेकडे काही शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. २०१० च्या दशकानंतर शेतकरी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का यात वाढत गेला. मात्र मधल्या काळात बदलेले निकष व नुकसानानंतर ७२ तासात संबंधित कंपनीला माहिती देण्याची अट, याबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेली अनभिज्ञता यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरविण्यास प्रारंभ केल्याचे एकंदरीत चित्र दिसते. त्यातच यासंदर्भातील वेबसाईटही नियमित व वेगाने कार्यरत राहत नसल्याने पीक विमा काढू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अवघ्या ४७ टक्केच शेतकऱ्यांनी १५ जुलै रोजीच्या शेवटच्या तारखेच्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत पीक विम्याच्या योजनेसाठी अर्ज करत रक्कम भरली होती.

--आंतरपीकाचीही समस्या--

बऱ्याचदा शेतकरी सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेतात. मात्र, विमा काढताना पोर्टलवर शेतकऱ्यांचा अनुषंगीक अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यासंदर्भात वारंवार विचार करूनही योग्य माहिती उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या क्षेत्राएवढी पिकाची तथा आंतरपिकाच्या क्षेत्राची बेरीज होत नाही, तोवर पोर्टलवर ते स्वीकारले जात नाही, असे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात संभ्रम निर्माण होत आहे.

--अशी पीक विम्याची स्थिती--

जिल्ह्यातील एकूण शेतकरी:- ५,८७,८४८

१५ जुलैपर्यंत पीक विमा काढलेले शेतकरी:- १,३९,४०४ (२३.७१ टक्के)

गेल्या वर्षी पीक विमा काढलेले शेतकरी :- २,९६,१५४ (५०.३७ टक्के)

गतवर्षी शेतकऱ्यांना मिळालेली पीक विम्याची रक्कम:- १७ कोटी

पेरणीचे एकूण क्षेत्र ७ लाख ३४ हजार ७११

प्रत्यक्षात यंदा झालेली पेरणी :- ८२ टक्के

पेरणी बाकी असलेले क्षेत्र :- १८ टक्के

१५ जुलैपर्यंत