शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २४ टक्केच शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST

त्यातच २०१३ मध्ये जेथे जिल्ह्यातील अवघ्या ०.३४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता तेथे गेल्या वर्षी ५० टक्के शेतकऱ्यांनी ...

त्यातच २०१३ मध्ये जेथे जिल्ह्यातील अवघ्या ०.३४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता तेथे गेल्या वर्षी ५० टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला, मात्र, लाभाबाबत शाश्वती नसल्याने सध्या या योजनेकडे काही शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. २०१० च्या दशकानंतर शेतकरी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का यात वाढत गेला. मात्र मधल्या काळात बदलेले निकष व नुकसानानंतर ७२ तासात संबंधित कंपनीला माहिती देण्याची अट, याबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेली अनभिज्ञता यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरविण्यास प्रारंभ केल्याचे एकंदरीत चित्र दिसते. त्यातच यासंदर्भातील वेबसाईटही नियमित व वेगाने कार्यरत राहत नसल्याने पीक विमा काढू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अवघ्या ४७ टक्केच शेतकऱ्यांनी १५ जुलै रोजीच्या शेवटच्या तारखेच्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत पीक विम्याच्या योजनेसाठी अर्ज करत रक्कम भरली होती.

--आंतरपीकाचीही समस्या--

बऱ्याचदा शेतकरी सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेतात. मात्र, विमा काढताना पोर्टलवर शेतकऱ्यांचा अनुषंगीक अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यासंदर्भात वारंवार विचार करूनही योग्य माहिती उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या क्षेत्राएवढी पिकाची तथा आंतरपिकाच्या क्षेत्राची बेरीज होत नाही, तोवर पोर्टलवर ते स्वीकारले जात नाही, असे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात संभ्रम निर्माण होत आहे.

--अशी पीक विम्याची स्थिती--

जिल्ह्यातील एकूण शेतकरी:- ५,८७,८४८

१५ जुलैपर्यंत पीक विमा काढलेले शेतकरी:- १,३९,४०४ (२३.७१ टक्के)

गेल्या वर्षी पीक विमा काढलेले शेतकरी :- २,९६,१५४ (५०.३७ टक्के)

गतवर्षी शेतकऱ्यांना मिळालेली पीक विम्याची रक्कम:- १७ कोटी

पेरणीचे एकूण क्षेत्र ७ लाख ३४ हजार ७११

प्रत्यक्षात यंदा झालेली पेरणी :- ८२ टक्के

पेरणी बाकी असलेले क्षेत्र :- १८ टक्के

१५ जुलैपर्यंत