शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

उन्हाळ्यात लाखो विद्यार्थ्यांची भूक भागवणार शालेय पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:58 IST

बुलडाणा: शाळेला उन्हाळी सुट्या लागल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार दिला जाणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: शाळेला उन्हाळी सुट्या लागल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या दोन लाखावर विद्यार्थ्यांची भूक शालेय पोषण आहारातून भागवली जाणार असून उन्हाळ्यात सर्व विद्यार्थ्यांची बायोमॅट्रीक हजेरी घेतली जाणार आहे. जिल्ह्यात पर्जन्यमान कमी राहिले व शेतातील उत्पादनातही शेतकºयांना मोठा फटका बसला. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. शेतकºयांना खरीपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. त्यामुळे खरीपाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली; अशा काही गावांमध्ये शासनातर्फे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये ६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, लोणार, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा व मोताळा या आठ तालुक्यांचा समावेश  करण्यात आला होता. त्यानंतर ८ जानेवारी २०१९ रोजी बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, जळगाव जामोद या तालुक्यातील २४६ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. दरम्यान, या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीतही शालेय पोषण आहार देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळा कालावधीत पोषण आहार नियमीत दिला जातो; मात्र आता वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही दुष्काळग्रस्त गावातील जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास २ लाख विद्यार्थ्यांना उन्हाळ्यामध्ये शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात या विद्यार्थ्यांची बायोमॅट्रीक हजेरी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारात बोगसपणा करणाºयांची गोची निर्माण झाली आहे. परिणामी स्वरूप उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराचे वाटप प्रामाणीकपणे करावे लागणार आहे. 

५६ दिवस दिला जाणार आहारजिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू राहतात. साधारणत: १ मे ते २५ जून पर्यंत उन्हाळी सुट्या असतात. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत दिला जाणारा पोषण आहार सरासरी ५६ दिवस राहणार आहे. 

उन्हाळ्यातही राहणार तेच ‘मेनू’शालेय पोषण आहारामध्ये तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, वरण भात, खिचडी यासारखे नियमीत मेनू असतात. शैक्षणिक सत्रामध्ये पोषण आहारात नियमीत दिले जाणारेच मेनू उन्हाळी सुटीतही राहणार आहेत. यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १०० तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज १५० ग्रॅम आहार दिला जाईल. 

 या शाळांचा समावेश दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उन्हाळी सुटीत पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळेबरोबर खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा