शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात अडीच हजार विद्यार्थी देणार 'एनटीएस' परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 15:47 IST

१३१ शाळांमधील २ हजार २७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

- संजय सोळंके  लोकमत न्यूज नेटवर्करायपूर : शालेय जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेली राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (राज्यस्तरीय ) १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील १३१ शाळांमधील २ हजार २७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाने त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे.आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धा परीक्षांनी दैनंदिन शैक्षणिक जीवन व्यापून टाकले आहे. कुठलीही शासकिय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा अनिवार्य आहे. शिपायापासून तर जिल्हाधिकारी पदाची निवड स्पर्धा परीक्षेतूनच होते. विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळविण्यासाठी स्पर्धा परिक्षांमधूनच जावे लागते. शालेय स्तरावर असणाºया आॅलिंपियाड, गणित संबोध, गणित प्रावीण्य, गणित प्रज्ञा, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा इ. परीक्षांमुळे बालपणातच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन रुजविला जातो.प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना शिष्यवृत्ती देणे हा या परीक्षेचा उद्देश आहे. अकरावी व बारावीसाठी दरमहा १२५० रुपये, सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत दरमहा २००० रुपये, सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत (पदव्युत्तर पदवी) दरमहा २००० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी ही परीक्षा प्रथम १९६२ ते १९८५ पर्यंत बारावी विज्ञान वर्गासाठी घेण्यात येत होती. पुढे १९८६ ते २००७ पर्यंत ही परीक्षा दहावीसाठी घेण्यात येऊ लागली. त्यानंतर २००७ ते २०११ पर्यंत ही परीक्षा आठवीसाठी घेण्यात येत होती. मात्र, २०१२ पासून पुन्हा ही परीक्षा दहावीसाठी घेण्यात येत आहे.महाराष्ट्रासाठी ही परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत घेण्यात येते. राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अशा दोन स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत घोषित केला जातो. राज्यस्तरीय परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय स्तर परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविले जाते. ही परीक्षा महत्वाची मानली जाते.राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यास दरमहा शिष्यवृत्ती मिळते. यामुळे इतर परीक्षांची तयारी होण्यास काही प्रमाणात मदत होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र संकतेस्थळावरुन काढून घ्यावे.- डॉ. श्रीराम पानझाडेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षा