शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

बुलडाणा जिल्ह्यातील ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 15:02 IST

टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्राथमिक शिक्षकांकरीता (इयत्ता पहिली ते आठवी) शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे. १३ फेबु्रवारी २०१३ ते ६ फेब्रुवारी २०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यामुळे टीईटी नसलेले शिक्षक संकटात सापडले आहेत.प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी वेळोवळी शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात आले. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर ६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या अनुदानित, विनाअनुदानित यासह सर्व माध्यमाच्या शाळांवरील प्राथमिक शिक्षकांना टीईटी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. अशा शिक्षकांसाठी तीन वेळा टीईटीची संधी देण्यात आली होती. परंतू या तीनही वेळा परीक्षेची काठीण्य पातळी वाढविण्यात आल्याने अनेक शिक्षक टीईटी उत्तीर्ण होऊ शकले नसल्याची आरोड शिक्षकांमधून होत आहे. आता तर १ जानेवारी २०२० पासून जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेशच देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रामध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांचे देयक न काढण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आठ ते दहा वर्षापासून बिनपगारावर काम करणाºया शिक्षकांनाही आता घरी बसण्याची वेळ आली आहे. राज्यातील १५ हजार शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. त्यात १०० टक्के अनुदानातील आठ हजार शिक्षक आहेत.जिल्ह्यात शंभरावर शिक्षक२०१३ नंतर नियुक्त झालेल्या व टीईटी नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही आता सुरू झाली आहे. जिल्ह्यात खाजगी शिक्षण संस्थामधील अनुदानित व विनाअनुदानित शाळेवरील टीईटी नसलेल्या शिक्षकांची संख्या १०० पर्यंत आहे. तर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत टीईटी अनुतिर्ण असलेले २९ शिक्षक आहेत. त्यामध्ये अमरावती विभागामध्ये सुमारे ४०० च्या आसपास ही शिक्षक संख्या आहे.शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्याबाबतचे निर्णय अनेकवेळा घेतले. काही वेळा ते निर्णय रद्दही करण्यात आले. तरीसूद्धा या कार्यकाळामध्ये शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या नवीन नियुक्त्या थांबविण्यात आल्या नाहीत. शिक्षक पात्रता परीक्षेला आमचा विरोध नाही. परंतू जे-जे शिक्षक सेवेत रूजू आहेत, त्यांना टीईटी उत्तीर्ण करण्याच्या जाचक अटीमधून तात्काळ मुक्तता देण्यात यावी. त्यांचे आज कुटुंब रस्त्यावर आले आहे.- सुरेश धामणे, कार्याध्यक्ष,टीईटी संघर्ष समिती, नागपूर.

२०१३ नंतर नियुक्त झालेले व टीईटी नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्या संदर्भात मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठविण्यात आले आहे. खाजगी शिक्षण संस्थातील अनुदानित व विनाअनुदानित कर्मचाºयांची सेवा समाप्तीची कार्यवाही संबंधित शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी. टीईटी नसलेल्या शिक्षकांची सेवा संबंधित शैक्षणिक संस्थांनी यापुढे सुरू ठेवल्यास शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.- एजाजुल खान, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक