शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींनी देशभक्तीची चेतना विदेशातही जागवली - विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 11:38 IST

Buldhana News राष्ट्रभक्ती कशी असावी, याचा आदर्श सुभाषबाबूंनी घालून दिला आहे, असे प्रतिपादन कादंबरीकार विश्वास पाटील यांनी शनिवारी येथे केले.

बुलडाणा : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जिकरीचा लढा दिला. आपल्या देशाबद्दल प्रेम, आदर प्रत्येकाला असावा, याविषयी युवकांमध्ये प्रेरणा जागवली. भारताच्या देशभक्तीची चेतना विदेशातही जागविण्याचे काम केले. राष्ट्रभक्ती कशी असावी, याचा आदर्श सुभाषबाबूंनी घालून दिला आहे, असे प्रतिपादन कादंबरीकार विश्वास पाटील यांनी शनिवारी येथे केले.

कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी, बुलडाणा (गर्दे वाचनालय सभागृह) येथे देशातील पहिले नेताजी जागर साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बाेलत हाेते. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, स्वागताध्यक्ष बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, बारोमासकार प्रा. सदानंद देशमुख, जयश्री शेळके, विजय अंभोरे, जयसिंगराजे देशमुख, सुरेश साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विश्वास पाटील पुढे म्हणाले, नेताजींच्या कार्यावर अभ्यास करताना अनेक देशात फिरलाे असता अवाक् झालो. जपानमध्ये महिलांना प्रोत्साहित करून त्यांनी एवढे परिवर्तन घडवून आणले की आज महिलाच कारभारी आहेत. सिंगापूरमध्येही त्यांनी क्रांती घडविली. झाशी राणी ब्रिगेड त्यांनी स्थापन केले. महिलांच्या हाती बंदूक देणारे नेताजी पहिले क्रांतिकारी आहेत असल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधी आणि नेताजी यांच्यात बेबनाव झाला होता. त्रिपुरा काँग्रेसमध्ये नेताजी भरघोस मतांनी निवडून आले. पण गांधींनीच सुभाषचंद्र बोस यांना पदावरून हटविण्याचा ठराव घेतला होता, असे पाटील यांनी बाेलताना सांगितले. नेताजींना नवी क्रांती करायची होती. मात्र, त्यांच्या सेनेतील सैनिकांना त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जाही मिळाला नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सैनिकांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता दिली, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले.

संमेलनाच्या प्रारंभी सकाळी ८ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक) येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसVishwash Patilविश्वास पाटील