शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

बुलडाण्यात ‘भिलवाडा पॅटर्न’ लागू करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 11:55 IST

‘भिलवाडा पॅर्टन’ लागू करण्यात यावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटेचे नेते रविकांत तुपकर यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाची बुलडाणा जिल्ह्यातील साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात राजस्थान मधील ‘भिलवाडा पॅर्टन’ लागू करण्यात यावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटेचे नेते रविकांत तुपकर यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांनी निवेदन दिले आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन केले असले तरी त्याचे गांभिर्य अद्याप अनेकांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्याचा फज्जा उडाला आहे. परिणामी बुलडाण्याप्रमाणेच २८ लाख लोकसंख्या असलेल्या भिलवाडा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पॅटर्नची बुलडाणा जिल्ह्यात अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.त्यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू थेट घरपोच पोहोचविण्याचे नियोजन यंत्रणेने करणे गरजेचे झाले आहे. ते झाल्यास नागरिक घराबाहेर पडणार नाही व कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. प्रशासकीय पातळीवर त्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. राजस्थान मधील भिलवाडा जिल्ह्याने याच पद्धतीचा अवलंब करत तेथील संसर्ग नियंत्रणात आणला आहे. त्यामुळे तो बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावेलॉकडाऊनची मुदत वाढू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच प्रभागनिहाय प्रभागनिहाय पथके तयार करून जिवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे नियोजन करावे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक, स्वंयसेवी संस्थांची मदतही घेतल्या जावू शकते. प्रसंगी आम्हीही स्वयंसेवक म्हणून भूमिका निभावू.

त्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना विश्वासात घेवून नियोजन करावे, अशी मागणीही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसा एक व्हीडीओही त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळाल्यास नागरिक बाहेर निघणार नाही व कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस