शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: “नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावं”; नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:46 IST

नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली असून, नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावे, असे म्हटले आहे. 

बुलडाणा:मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी २६ दिवस कोठडीत काढल्यानंतर अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, आर्यन खानला अटक करण्यात आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि या तपास यंत्रणेवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोप आणि टीकेला समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) प्रत्युत्तर देत असून, भाजपही नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. यातच केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली असून, नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावे, असे म्हटले आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुलडाणा येथे मीडियाशी संवाद साधला. दि. चिखली अर्बन को ऑप बँक लि.च्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त नि:शुल्क उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यावेळी नारायण राणे उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांना समीर वानखेडे यांच्या पाठीशी केंद्र सरकार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, मी आता जाईन आणि मोदी साहेबांना विचारेन की आपण पाठीमागे आहोत का, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी

नवाब मलिक कोण आहे? त्यांचे जावई कोण आहे? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी आणि मग दुसऱ्यांवर बोलावे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केलेत की, चेंबूर येथील एक व्यक्ती फडणवीस यांच्या जवळचा आहे आणि ईडीच्या सतत संपर्कात समीर वानखेडे असतात, असे माध्यम प्रतिनिधींनी सांगितल्यावर नारायण राणे यांनी सांगितले की, मग काय त्यात काय झाले? कोण कोणाचा मित्र आहे, माझाही आहे तो, मित्र नाही तर तो आमचा कार्यकर्ता आहे. मी चेंबूरचा आहे, मुळात माझे लहानपण, आयुष्य  चेंबूरमध्ये गेले आणि तो काही दहशतवादी नाही आणि तो संपर्कात असतो ईडीची ओळख आहे, चांगली माहिती देतो, दोन नंबरच्या लोकांची. पैसे लपून ठेवतात ना त्या लोकांची. भुजबळांना अटक का झाली, पंढरपूरला तीर्थ यात्रेला गेले म्हणून झाली का? ते आता फार बोलत आहेत, असा पलटवार नारायण राणे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला.  

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीNarayan Raneनारायण राणेnawab malikनवाब मलिक