शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान:  दुर्धर आजार बरे करण्याचा पेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 20:58 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभाग मोहीमेची माहिती गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. 

- ब्रह्मानंद जाधव। बुलडाणा : जिल्ह्यात सध्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियान युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये कोरोनाची लक्षणे असणाºया व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तातडीने कोवीड सेंटरमध्ये जमा करण्यात येत आहे. परंतू कोरोनासोबतच दुर्धर आजाराचे रुग्णही यामध्ये समोर येत आहेत. त्यामुळे दुर्धर आजार बरे करण्याचा नवा पेच आता आरोग्य विभागासमोर निर्माण झाला असून, जिल्हा परिषद आरोग्य विभाग मोहीमेची माहिती गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियान १५ सप्टेंबर पासून सुरू झाले असून, १० आॅक्टोबर पर्यंत राहणार आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात २६ लाख ६० हजार ८९७ लोकसंख्येची तपासणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १ हजार ७१८ पथकांकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये गंभीर आजार असलेल्या रूग्णांची वेगळी नोंद करण्यात येत आहे. तीव्र श्वसनाचे आजार व फ्लू सदृश्य आजारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि आॅक्सिजन लेव्हल तपासणी करण्यात येत आहे. संदिग्ध कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहेत. परंतू या मोहिमेमध्ये वेगवेळ्या दुर्धर आजाराचे रुग्ण सापडत आहेत. त्यांमध्ये मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, कँसन, क्षयरुग्ण यासारखे आजार असणारे रुग्ण समोर येत आहेत. परंतू त्यांना उपचाराचा सल्ला देऊन सोडून देण्यात येत आहे. हे आजार बरे करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर निर्माण होत आहे. अनेक जुनाट आजार समोर आल्यानंतर आशा, व सर्वे करणारे इतर कर्मचारी आपल्या अहवालावर नोंद करून पुढचे घर घेत आहेत.

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियानातून दूर्धर आजाराचे रुग्ण सापडत आहेत. त्या सर्व रुग्णांची माहिती सध्या एक त्र करण्यात येत आहे. - बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य