शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पूर्व वैमनस्यातून खून; आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 20:31 IST

खामगाव: पूर्व वैमनस्यातून खून केल्याचे सिध्द झाल्याने एका आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व ...

खामगाव: पूर्व वैमनस्यातून खून केल्याचे सिध्द झाल्याने एका आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी गुरूवारी हा महत्वपूर्ण निकाल दिला.

७ मे २०१३ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गजानन विश्वनाथ काकडे रा. वरवट बकाल याने पिंपळगाव राजा येथे  फिर्यादी सुनील प्रकाश राठोड आणि त्यांचे मोठे वडील शिवलाल राठोड यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. तत्पूर्वी सतत ७-८ दिवसांपासून आरोपी गजानन काकडे हा त्यांच्या घराकडे चकरा मारत होता. दरम्यान, ७ मे रोजी सुनिल राठोड हे संजय मोहन चव्हाण यांच्या घराकडे जात असताना, आरोपीने पाठलाग केला. यावेळी सुनिल राठोड यांचे मोठेबाबा मध्यस्थी करण्यास आले असता आरोपीने आपल्या जवळील चाकू शिवलाल राठोड यांच्या पोटात खुपसला. आणि घटनास्थळावूरन पळून गेला. जखमी अवस्थेत शिवराल राठोड यांना औरंगाबाद येथे भरती करण्यात आले. ८ मे २०१३ रोजी सुनिल प्रकाश राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात भादंवि कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जखमी शिवलाल राठोड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पिंपळगाव राजा पोलिसांनी  गुन्ह्यात भादंवि कलम ३०२ अन्वये वाढ केली.

तपासाअंती दोषारोप पत्र  जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे दाखल केले. याप्रकरणी १७ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी विरोधात दोषारोप सिध्द झाल्याने आरोपी गजानन विश्वनाथ काकडे यास भादंवि कलम ३०२ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा आणि  एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावास तर कलम ५०६ मध्ये एक वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारवास अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अतीरिक्त शासकिय अभियोक्ता कु . रजनी बावस्कार (भालेराव) यांनी काम पाहीले..

      सदर प्रकरणात वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल वनारे,डॉ. विकास राठोड व आरोपीस तपासनारे डॉ.अरूण पानझाडे , तसेच मृतकचे मृत्यूूपुर्व बयान नोंदविणारे नायब तहसिलदार आनंद बोबडे औरंगाबाद आणि  साक्षीदार संजय चव्हान , फियार्दी सुनिल ह्याची साक्ष महत्व पूर्ण ठरली.