शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतीच्या वादातून दोन भावांचा खून; पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:20 IST

शेतीच्या वादातून दोन भावांचा खून; पाच अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा/धामणगाव बढे : शेतीच्या वादातून दोन सख्या भावांचा पुतण्याने धारधार शस्त्राने खून केल्याची घटना १२ जून रोजी मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावात घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा धामगाव बढे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेत त्र्यंबक रामलाल मोरे (५५) आणि त्यांचा भाऊ सुभाष रामलाल मोरे या दोघांचा मृत्यू झाला असून सुनील सुभाष मोरे व अनिल तुळशीराम मोरे हे दोघे जखमी झाले आहेत. प्रकरणी आरोपी उमेश गजानन मोरे, त्याचा भाऊ मंगेश मोरे, वडील गजानन मोरेसह उमेशची बहीण व आईलाही अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुरूवारी मोताळा तालुक्यात पाऊस झाला. त्यामुळे वरील बाजूस शेत असलेल्या आरोपी गजानन मोरे यांनी त्यांच्या शेतातील पाणी दांडाने त्र्यंबक मोरे व सुभाष मोरे यांच्या शेतात काढले होते. त्याचा जाब दुपारी गजानन मोरेला दोघांनी विचारला असता त्यांना गजानन मोरे व त्याच्या मुलांनी धमकावले होते. सोबतच त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न शेतातच केला होता. त्यामुळे लगतच्या नागरिकांनी त्यांचे भांडण सोडवले होते. दरम्यान सायंकाळी त्र्यंबक मोरे, सुभाष मोरे व त्यांचे कुटुंबिय संबंधित प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गजानन मोरे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी गजानन मोरे यांच्या मुलाने घरातून धारधार शस्त्र आणून सुभाष मोरे व त्र्यंबक मोरे यांचा खून केला. या घटनेमध्ये झालेल्या हातापायीत सुनील सुभाष मोरे आणि अनिल तुळशीराम मोरे हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनेचे गांभिर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, धामणगाव बढे पोलिस ठाण्याचे ठाणेदार ठाकूर व त्यांच्या सहकाºयांनी लगोलग घटनास्थळ गाठून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पावसाचे पाणी वादास ठरले कारण

गुरुवारी मोताळा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे वरच्या बाजूला असलेले गजानन मोरे यांच्या शेतात असलेले पाणी त्यांनी दांड काढून बाहेर काढले. ते सुभाष मोरे व त्र्यंबक मोरे यांच्या शेतात घुसले. त्यामुळे उभय कुटुंबात वाद झाले. व त्याचे पर्यावसन हे भाऊबंदकीच्या संघर्षात होऊन त्र्यंबक मोरे व सुभाष मोरे यांना जीव गमवावा लागला. दोन्ही मृतक व आरोपी गजानन मोरे हे चुलत भाऊ आहेत. तर प्रकरणातील मुख्य आरोपी उमेश मोरे हा मृतकांचा नात्याने पुतण्या लागत होता.

सायंकाळी घडली घटना

ही खुनाची खळबळ जनक घटना सिंदखेड गावात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. गजानन मोरे व सुभाष आणि त्र्यंबक मोरे यांच्यामध्ये आधी शेतात वाद झाला होता. त्यावेळी त्र्यंबक आणि सुभाष मोरे दोघेच होते. तेथे त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर गावात आल्यावर या वादाला पुन्हा तोंड फुटले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळाCrime Newsगुन्हेगारी