शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

शेतीच्या वादातून दोन भावांचा खून; पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:20 IST

शेतीच्या वादातून दोन भावांचा खून; पाच अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा/धामणगाव बढे : शेतीच्या वादातून दोन सख्या भावांचा पुतण्याने धारधार शस्त्राने खून केल्याची घटना १२ जून रोजी मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावात घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा धामगाव बढे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेत त्र्यंबक रामलाल मोरे (५५) आणि त्यांचा भाऊ सुभाष रामलाल मोरे या दोघांचा मृत्यू झाला असून सुनील सुभाष मोरे व अनिल तुळशीराम मोरे हे दोघे जखमी झाले आहेत. प्रकरणी आरोपी उमेश गजानन मोरे, त्याचा भाऊ मंगेश मोरे, वडील गजानन मोरेसह उमेशची बहीण व आईलाही अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुरूवारी मोताळा तालुक्यात पाऊस झाला. त्यामुळे वरील बाजूस शेत असलेल्या आरोपी गजानन मोरे यांनी त्यांच्या शेतातील पाणी दांडाने त्र्यंबक मोरे व सुभाष मोरे यांच्या शेतात काढले होते. त्याचा जाब दुपारी गजानन मोरेला दोघांनी विचारला असता त्यांना गजानन मोरे व त्याच्या मुलांनी धमकावले होते. सोबतच त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न शेतातच केला होता. त्यामुळे लगतच्या नागरिकांनी त्यांचे भांडण सोडवले होते. दरम्यान सायंकाळी त्र्यंबक मोरे, सुभाष मोरे व त्यांचे कुटुंबिय संबंधित प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गजानन मोरे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी गजानन मोरे यांच्या मुलाने घरातून धारधार शस्त्र आणून सुभाष मोरे व त्र्यंबक मोरे यांचा खून केला. या घटनेमध्ये झालेल्या हातापायीत सुनील सुभाष मोरे आणि अनिल तुळशीराम मोरे हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनेचे गांभिर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, धामणगाव बढे पोलिस ठाण्याचे ठाणेदार ठाकूर व त्यांच्या सहकाºयांनी लगोलग घटनास्थळ गाठून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पावसाचे पाणी वादास ठरले कारण

गुरुवारी मोताळा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे वरच्या बाजूला असलेले गजानन मोरे यांच्या शेतात असलेले पाणी त्यांनी दांड काढून बाहेर काढले. ते सुभाष मोरे व त्र्यंबक मोरे यांच्या शेतात घुसले. त्यामुळे उभय कुटुंबात वाद झाले. व त्याचे पर्यावसन हे भाऊबंदकीच्या संघर्षात होऊन त्र्यंबक मोरे व सुभाष मोरे यांना जीव गमवावा लागला. दोन्ही मृतक व आरोपी गजानन मोरे हे चुलत भाऊ आहेत. तर प्रकरणातील मुख्य आरोपी उमेश मोरे हा मृतकांचा नात्याने पुतण्या लागत होता.

सायंकाळी घडली घटना

ही खुनाची खळबळ जनक घटना सिंदखेड गावात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. गजानन मोरे व सुभाष आणि त्र्यंबक मोरे यांच्यामध्ये आधी शेतात वाद झाला होता. त्यावेळी त्र्यंबक आणि सुभाष मोरे दोघेच होते. तेथे त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर गावात आल्यावर या वादाला पुन्हा तोंड फुटले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळाCrime Newsगुन्हेगारी