शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोतंर्गत कालमर्यादेत मजुरी देण्यात बुलडाणा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:41 IST

बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत निर्धारित १५ दिवसांच्या कालमर्यादेत कामावरील मजुरांना त्यांचा मेहनताना अर्थात मजुरी देण्यामध्ये बुलडाणा व भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरले आहे.

ठळक मुद्देअकुशल कामापोटी मजुरांना दहा आॅगस्टपर्यंतच्या वेळेत २० कोटी ८७ लाख ४१ हजार रुपयांची मजुरी प्रदान केली आहे.कायद्यानुसार वर्षातील किमान ३६२ दिवस काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. बुलडाणा जिल्ह्यात संपलेल्या आठवड्यात ३८ हजार ६५६ मजूर कामावर होते.

- नीलेश जोशी

बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत निर्धारित १५ दिवसांच्या कालमर्यादेत कामावरील मजुरांना त्यांचा मेहनताना अर्थात मजुरी देण्यामध्ये बुलडाणा व भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरले आहे. आॅगस्ट महिन्याची यासंदर्भातील आकडेवारी पाहता ही बाब स्पष्ट होत आहे. कधीकाळी मनरेगाच्या कामात माघारलेला जिल्हा अशी बुलडाण्याची ओळख असताना कामकाजाच्या पद्धतीत रोहयो विभागाने अमुलाग्र बदल करून वेळेत कामे पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य दिल्याचा परिणाम म्हणून हा आता राज्यात वरच्या क्रमांकाच्या जिल्ह्यात गणला जात आहे. चालू आर्थिक वर्षात अकुशल कामापोटी मजुरांना दहा आॅगस्टपर्यंतच्या वेळेत २० कोटी ८७ लाख ४१ हजार रुपयांची मजुरी प्रदान केली आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात संपलेल्या आठवड्यात ३८ हजार ६५६ मजूर कामावर होते. प्रतीदिन सहा हजार ४४३ मजूर सरासरी कामावर असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामुख्याने वृक्षलागवडीची जी कामे सुरू आहेत, त्यावर हे मजूर कार्यरत आहे. केंद्राच्या कायद्यानुसार मजुरांना रोहयोतंर्गत किमान १०० दिवस तर महाराष्ट्राच्या कायद्यानुसार वर्षातील किमान ३६२ दिवस काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात मनरेगातंर्गत यंत्रणा कार्यरत आहेत. सिंचन विहिरी, शोषखड्डे, वृक्ष लागवड, रोपवाटिकांसह गोठे, तुती लागवडीच्या योजनांवर जिल्ह्यातील मजूर सध्या कार्यरत आहेत. अशा मजुरांना १५ दिवसांच्या आत त्यांच्या कामाची मजुरी देणे बंधनकारक आहे. परिणामस्वरुप रोहयो विभागाची सकाळ ही प्रथमत: मजुरांचे ई मस्टर तपासून त्यांची मजुरी काढण्यातच जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१८-१९ या आर्थिक वर्षात आजपर्यंत २३ हजार १२५ जणांचे ई-मस्टर वितरीत झालेली आहेत. थेट व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच तालुक्यातील ई- मस्टरचे प्रश्न निकाली काढण्याच्या सुचना देण्यात आलेल्या असल्याचे रोहयोचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले. २०१० ते २०१४ दरम्यान रोहयोच्या कामावरील पाच मजुरांच्या आत्महत्याने बुलडाणा जिल्हा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. औरंगाबाद जिल्ह्याती सिल्लोड तालुक्यात यातीलकाही मजूर कामावर होते. त्यावेळी केंद्राच्या एका पथकाने आत्महत्यांची संख्या जास्त असलेल्या लोणार तालुक्यात सामाजिक अंकेक्षण करून ‘काम माँगो अभियान’ ही राबवले होते. त्या पृष्ठभूमीवर बुलडाण्याची ही कामगिरी महत्त्वपूर्ण म्हणावी लागले.

आर्थिक वर्षात २७ कोटींचा खर्च

मनरेगातंर्गत जिल्ह्यात एप्रिल ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत २६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. त्यात अकुशल कामाची मजुरांना देण्यात येणारी मजुरीच ही २० कोटी ८१ लाख ४७ हजार रुपये आहे तर कुशल कामापोटी चार कोटी ५२ लाख ९० हजार रुपये आणि प्रशासकीय खर्चाचा यात समावेश आहे. सोबतच चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत अकुशल खर्चाच्या कामाची टक्केवारी ८३.१३ टक्के तर कुशल खर्चाची टक्केवारी ही १६.८७ टक्के आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना