शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रोहयोतंर्गत कालमर्यादेत मजुरी देण्यात बुलडाणा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:41 IST

बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत निर्धारित १५ दिवसांच्या कालमर्यादेत कामावरील मजुरांना त्यांचा मेहनताना अर्थात मजुरी देण्यामध्ये बुलडाणा व भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरले आहे.

ठळक मुद्देअकुशल कामापोटी मजुरांना दहा आॅगस्टपर्यंतच्या वेळेत २० कोटी ८७ लाख ४१ हजार रुपयांची मजुरी प्रदान केली आहे.कायद्यानुसार वर्षातील किमान ३६२ दिवस काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. बुलडाणा जिल्ह्यात संपलेल्या आठवड्यात ३८ हजार ६५६ मजूर कामावर होते.

- नीलेश जोशी

बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत निर्धारित १५ दिवसांच्या कालमर्यादेत कामावरील मजुरांना त्यांचा मेहनताना अर्थात मजुरी देण्यामध्ये बुलडाणा व भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरले आहे. आॅगस्ट महिन्याची यासंदर्भातील आकडेवारी पाहता ही बाब स्पष्ट होत आहे. कधीकाळी मनरेगाच्या कामात माघारलेला जिल्हा अशी बुलडाण्याची ओळख असताना कामकाजाच्या पद्धतीत रोहयो विभागाने अमुलाग्र बदल करून वेळेत कामे पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य दिल्याचा परिणाम म्हणून हा आता राज्यात वरच्या क्रमांकाच्या जिल्ह्यात गणला जात आहे. चालू आर्थिक वर्षात अकुशल कामापोटी मजुरांना दहा आॅगस्टपर्यंतच्या वेळेत २० कोटी ८७ लाख ४१ हजार रुपयांची मजुरी प्रदान केली आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात संपलेल्या आठवड्यात ३८ हजार ६५६ मजूर कामावर होते. प्रतीदिन सहा हजार ४४३ मजूर सरासरी कामावर असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामुख्याने वृक्षलागवडीची जी कामे सुरू आहेत, त्यावर हे मजूर कार्यरत आहे. केंद्राच्या कायद्यानुसार मजुरांना रोहयोतंर्गत किमान १०० दिवस तर महाराष्ट्राच्या कायद्यानुसार वर्षातील किमान ३६२ दिवस काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात मनरेगातंर्गत यंत्रणा कार्यरत आहेत. सिंचन विहिरी, शोषखड्डे, वृक्ष लागवड, रोपवाटिकांसह गोठे, तुती लागवडीच्या योजनांवर जिल्ह्यातील मजूर सध्या कार्यरत आहेत. अशा मजुरांना १५ दिवसांच्या आत त्यांच्या कामाची मजुरी देणे बंधनकारक आहे. परिणामस्वरुप रोहयो विभागाची सकाळ ही प्रथमत: मजुरांचे ई मस्टर तपासून त्यांची मजुरी काढण्यातच जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१८-१९ या आर्थिक वर्षात आजपर्यंत २३ हजार १२५ जणांचे ई-मस्टर वितरीत झालेली आहेत. थेट व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच तालुक्यातील ई- मस्टरचे प्रश्न निकाली काढण्याच्या सुचना देण्यात आलेल्या असल्याचे रोहयोचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले. २०१० ते २०१४ दरम्यान रोहयोच्या कामावरील पाच मजुरांच्या आत्महत्याने बुलडाणा जिल्हा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. औरंगाबाद जिल्ह्याती सिल्लोड तालुक्यात यातीलकाही मजूर कामावर होते. त्यावेळी केंद्राच्या एका पथकाने आत्महत्यांची संख्या जास्त असलेल्या लोणार तालुक्यात सामाजिक अंकेक्षण करून ‘काम माँगो अभियान’ ही राबवले होते. त्या पृष्ठभूमीवर बुलडाण्याची ही कामगिरी महत्त्वपूर्ण म्हणावी लागले.

आर्थिक वर्षात २७ कोटींचा खर्च

मनरेगातंर्गत जिल्ह्यात एप्रिल ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत २६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. त्यात अकुशल कामाची मजुरांना देण्यात येणारी मजुरीच ही २० कोटी ८१ लाख ४७ हजार रुपये आहे तर कुशल कामापोटी चार कोटी ५२ लाख ९० हजार रुपये आणि प्रशासकीय खर्चाचा यात समावेश आहे. सोबतच चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत अकुशल खर्चाच्या कामाची टक्केवारी ८३.१३ टक्के तर कुशल खर्चाची टक्केवारी ही १६.८७ टक्के आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना