शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तेल्हारा जलाशयातील लाखो लिटर पाणी गेले वाया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:51 IST

तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पिके धोक्यात आली असून,  दोषी कर्मचार्‍यांवर  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

ठळक मुद्देदोषी कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाईची शेतकर्‍यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर  पाणी वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली असून,  याची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचार्‍यांवर  फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पाण्यावर  विसंबून असलेल्या शेतकर्‍यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे की, तेल्हारा जलाशयाचे गेट गेल्या अनेक वर्षांपासून  नादुरूस्त असल्याने त्यातून या जलाशयातील पाणी वाया जाते.  याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना वारंवार गेट दुरूस् तीबाबत सांगुनही शेतकर्‍यांच्या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष  करण्यात येत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. तसेच  ‘पाणी वाया जावू द्यायचे नसेल, तर तुमचे तुम्हीच करून घ्या’,  असे उर्मटपणाचे उत्तरही सिंचन विभागाच्या संबंधित  कर्मचार्‍यांकडून दिल्या गेल्याने या जलाशयातून उपसा पद्धतीने  पाणी घेणार्‍या शेतकर्‍यांनी माती टाकून पाणी अडविले होते; मात्र  संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी ती माती जेसीबीच्या सहाय्याने  बाजूला करण्यासोबत पुन्हा शेतकर्‍यांनी असे करू नये, यासाठी  त्याठिकाणी मोठ्ठा खड्डादेखील करून ठेवला असल्याने दरवर्षी या  जलाशयातून पाणी वाया जाते. तर यावर्षी आधिच पाणीसाठा कमी असून, त्यात पाणी वाया  गेल्यामुळे शेतकर्‍यांची पिके व खरीप हंगाम धोक्यात आला  असल्याने शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांना पाण्या पासून वंचित ठेवण्यासह पाणी वाया घालविणार्‍या व कर्तव्यात  कसूर करणार्‍या दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी दाखल  करण्यात यावी व या जलाशयाचे गेट तातडीने दुरूस्त करून  द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला  आहे. या निवेदनावर विनायक सरनाईक, गजानन ठेंग, o्रावण  बडगे, रोहन गिरणारे, गौतम साळवे, तुकाराम साळवे, भाऊराव  सरनाईक, टी. आर. ठेंग, डी.बी.ठेंग, गौतम साळवे, पुरूषोत्तम  ठेंग, व्ही.बी.ठेंग, सुधाकर पंडागळे आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या  आहेत. 

टॅग्स :Waterपाणी