शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा जलाशयातील लाखो लिटर पाणी गेले वाया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:51 IST

तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पिके धोक्यात आली असून,  दोषी कर्मचार्‍यांवर  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

ठळक मुद्देदोषी कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाईची शेतकर्‍यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर  पाणी वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली असून,  याची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचार्‍यांवर  फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पाण्यावर  विसंबून असलेल्या शेतकर्‍यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे की, तेल्हारा जलाशयाचे गेट गेल्या अनेक वर्षांपासून  नादुरूस्त असल्याने त्यातून या जलाशयातील पाणी वाया जाते.  याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना वारंवार गेट दुरूस् तीबाबत सांगुनही शेतकर्‍यांच्या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष  करण्यात येत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. तसेच  ‘पाणी वाया जावू द्यायचे नसेल, तर तुमचे तुम्हीच करून घ्या’,  असे उर्मटपणाचे उत्तरही सिंचन विभागाच्या संबंधित  कर्मचार्‍यांकडून दिल्या गेल्याने या जलाशयातून उपसा पद्धतीने  पाणी घेणार्‍या शेतकर्‍यांनी माती टाकून पाणी अडविले होते; मात्र  संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी ती माती जेसीबीच्या सहाय्याने  बाजूला करण्यासोबत पुन्हा शेतकर्‍यांनी असे करू नये, यासाठी  त्याठिकाणी मोठ्ठा खड्डादेखील करून ठेवला असल्याने दरवर्षी या  जलाशयातून पाणी वाया जाते. तर यावर्षी आधिच पाणीसाठा कमी असून, त्यात पाणी वाया  गेल्यामुळे शेतकर्‍यांची पिके व खरीप हंगाम धोक्यात आला  असल्याने शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांना पाण्या पासून वंचित ठेवण्यासह पाणी वाया घालविणार्‍या व कर्तव्यात  कसूर करणार्‍या दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी दाखल  करण्यात यावी व या जलाशयाचे गेट तातडीने दुरूस्त करून  द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला  आहे. या निवेदनावर विनायक सरनाईक, गजानन ठेंग, o्रावण  बडगे, रोहन गिरणारे, गौतम साळवे, तुकाराम साळवे, भाऊराव  सरनाईक, टी. आर. ठेंग, डी.बी.ठेंग, गौतम साळवे, पुरूषोत्तम  ठेंग, व्ही.बी.ठेंग, सुधाकर पंडागळे आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या  आहेत. 

टॅग्स :Waterपाणी