शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

तेल्हारा जलाशयातील लाखो लिटर पाणी गेले वाया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:51 IST

तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पिके धोक्यात आली असून,  दोषी कर्मचार्‍यांवर  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

ठळक मुद्देदोषी कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाईची शेतकर्‍यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त  असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी  वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर  पाणी वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली असून,  याची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचार्‍यांवर  फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पाण्यावर  विसंबून असलेल्या शेतकर्‍यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे की, तेल्हारा जलाशयाचे गेट गेल्या अनेक वर्षांपासून  नादुरूस्त असल्याने त्यातून या जलाशयातील पाणी वाया जाते.  याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना वारंवार गेट दुरूस् तीबाबत सांगुनही शेतकर्‍यांच्या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष  करण्यात येत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. तसेच  ‘पाणी वाया जावू द्यायचे नसेल, तर तुमचे तुम्हीच करून घ्या’,  असे उर्मटपणाचे उत्तरही सिंचन विभागाच्या संबंधित  कर्मचार्‍यांकडून दिल्या गेल्याने या जलाशयातून उपसा पद्धतीने  पाणी घेणार्‍या शेतकर्‍यांनी माती टाकून पाणी अडविले होते; मात्र  संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी ती माती जेसीबीच्या सहाय्याने  बाजूला करण्यासोबत पुन्हा शेतकर्‍यांनी असे करू नये, यासाठी  त्याठिकाणी मोठ्ठा खड्डादेखील करून ठेवला असल्याने दरवर्षी या  जलाशयातून पाणी वाया जाते. तर यावर्षी आधिच पाणीसाठा कमी असून, त्यात पाणी वाया  गेल्यामुळे शेतकर्‍यांची पिके व खरीप हंगाम धोक्यात आला  असल्याने शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांना पाण्या पासून वंचित ठेवण्यासह पाणी वाया घालविणार्‍या व कर्तव्यात  कसूर करणार्‍या दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी दाखल  करण्यात यावी व या जलाशयाचे गेट तातडीने दुरूस्त करून  द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला  आहे. या निवेदनावर विनायक सरनाईक, गजानन ठेंग, o्रावण  बडगे, रोहन गिरणारे, गौतम साळवे, तुकाराम साळवे, भाऊराव  सरनाईक, टी. आर. ठेंग, डी.बी.ठेंग, गौतम साळवे, पुरूषोत्तम  ठेंग, व्ही.बी.ठेंग, सुधाकर पंडागळे आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या  आहेत. 

टॅग्स :Waterपाणी