शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
3
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
4
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
6
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
7
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
8
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
9
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
10
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
11
Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
12
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
13
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
14
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
15
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
16
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
17
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
18
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
19
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
20
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाचा अंदाज घेऊन सूक्ष्म व्यवस्थापन करावे-मनेश यदुलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST

बुलडाणा :पावसाचा लहरीपणा आणि कमी कालावधीत जास्त पडलेला पाऊस यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ ...

बुलडाणा :पावसाचा लहरीपणा आणि कमी कालावधीत जास्त पडलेला पाऊस यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे हवामान अंदाजाविषयी अद्ययावत माहिती प्राप्त करून शेतीचे सूक्ष्म व्यवस्थापन करावे, असे प्रतिपादन कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी केले

जून महिन्यात मोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंतचा पावसाचा प्रवास तालुकानिहाय भिन्न असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या खरीप हंगामातील पीक उत्पादनात अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र , कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणाच्यावतीने १५ सप्टेंबर राेजी पाेखरी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले़ यावेळी ते बाेलत हाेते़

जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलडाणाचे मनेश यदुलवार (कृषी हवामान तज्ज्ञ), अनिल जाधव (कृषी हवामान निरीक्षक) तसेच कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणाच्या कृषी शास्त्रज्ञ डॉ. भारती तिजारे व दिनेश चर्हाटे ( सहायक) उपस्थित होते.

.पीक प्रात्यक्षिकांचे महत्व व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी डॉ. भारती तिजारे, कृषी शास्त्रज्ञ यांनी यावेळी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. हवामान बदल आणि शेती व्यवस्थापन यांची योग्य सांगड घालताना मेघदूत/दामिनी ॲपचे योगदान किती महत्वपूर्ण आहे यावर अनिल जाधव, कृषी हवामान निरीक्षक यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पोखरी येथील प्रशांत औतकार, पंढरीनाथ एकडे, प्रताप गाडेकर, स्वप्निल वाघ, विष्णू तायडे यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा

ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा यांच्याद्वारे दर मंगळवारी आणि शुक्रवारी हवामान अंदाजावर आधारित तालुकानिहाय आणि पीकनिहाय कृषी सल्ला पत्रिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. या कृषी सल्ल्याचा शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेतीकामाच्या नियोजनात महत्वाचा वाटा आहे़ म्हणून मोठ्या संख्येने शेतकरी वर्गाने या कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा व शेतीला शाश्वततेकडे न्यावे असे आवाहन यदुलवार यांनी यावेळी केले.